749 कोरोनामुक्त ः मनपाक्षेत्रात 260 तर ग्रामीण भागात 790 रूग्ण
प्रतिनिधी/सांगली
जिल्ह्यात कोरोनाचा हाहाकार सुरूच आहे. जिल्हÎात मृत्यूचे तांडव तर थांबण्याचे नाव घेत नाही. जिल्हÎात रविवारी एकाच दिवशी उंच्चाकी 33 जणांचा मृत्यू झाला आहे. तर दिवसभरात एक हजार 150 रूग्ण वाढले आहेत. महापालिका क्षेत्रात 260 तर ग्रामीण भागात तब्बल 790 रूग्ण वाढले आहेत. उपचार सुरू असणारे 749 रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर सध्या उपचारात 11 हजार 378 रूग्ण आहेत.
मनपाक्षेत्रात 260 रूग्ण वाढले
महापालिका क्षेत्रात रूग्णसंख्या आता मोठÎाप्रमाणात वाढत चालली आहे. महापालिका क्षेत्रात नवीन 260 रूग्ण वाढले आहेत. सांगली, मिरज आणि कुपवाड शहरात दिवसेंदिवस ही रूग्णसंख्या वाढतच चालली आहे. सांगली शहरात 186 तर मिरज शहरात 74 रूग्ण वाढले आहेत. महापालिका क्षेत्रात आजअखेर 21 हजार 457 कोरोनाबाधित रूग्ण आढळून आले आहेत. त्यातील 75 टक्के रूग्ण बरे झाले आहेत. तर उपचारातील रूग्णसंख्येचा आकडा वाढतच चालला आहे.
ग्रामीणभागात 790 रूग्ण वाढले
ग्रामीण भागात रूग्णसंख्येचा उद्रेक सुरू झाला आहे. जिल्हÎातील प्रत्येक तालुक्यात रूग्णसंख्या वाढतच चालली आहे. रूग्ण आटोक्यात येण्याची कोणतीही चित्र दिसून येत नाही. प्रत्येक तालुक्यात रूग्णसंख्या वाढतच चालली आहे. आटपाडी तालुक्यात 121 तर कडेगाव तालुक्यात 67 रूग्ण वाढले आहेत. खानापूर तालुक्यात 143 तर पलूस तालुक्यात 17 रूग्ण वाढले आहेत. तासगाव तालुक्यात 110 तर जत तालुक्यात 104 रूग्ण आढळून आले आहेत. कवठेमहांकाळ तालुक्यात 71, मिरज तालुक्यात 166 रूग्ण वाढले. शिराळा तालुक्यात 23 तर वाळवा तालुक्यात 68 रूग्ण वाढले आहेत.
तब्बल 33 जणांचा मृत्यू
जिल्हÎात रविवारी उच्चांकी 33 जणांचे मृत्यू झाले आहेत. एकाच दिवशी 33 जणांना कोरोनाने प्राण गमावावे लागले आहेत. महापालिका क्षेत्रात सात रूग्णांचा मृत्यू झाला आहे. सांगली शहरातील एक आणि मिरज शहरातील चार आणि कुपवाड शहरातील दोघांचा मृत्यू झाला आहे. आटपाडी तालुक्यात दोन तर कडेगाव तालुक्यात दोन आणि खानापूर तालुक्यात सात रूग्णांचा मृत्यू झाला आहे. पलूस तालुक्यात दोन तर तासगाव तालुक्यात पाच रूग्णांचा मृत्यू झाला आहे. जत तालुक्यात एक तर कवठेमहांकाळ तालुक्यात दोन रूग्णांचा मृत्यू झाला आहे. मिरज तालुक्यात एक तर शिराळा तालुक्यात दोघांचा मृत्यू झाला आहे. जिल्हÎात वाळवा तालुक्यात दोन जणांचा मृत्यू झाला आहे.
749 रूग्णांची कोरोनावर मात
जिल्हÎात कोरोनाचे उपचार सुरू असणारे 749 रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आजअखेर जिल्हÎात 69 हजार 191 रूग्ण कोरोनाबाधित झाले आहेत. तर त्यातील 55 हजार 710 रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
नवे रूग्ण 1150
उपचारात 11378
बरे झालेले 55710
एकूण 69191
मृत्यू 2103
रविवारचे बाधित रूग्ण
तालुका रूग्ण
आटपाडी 121
कडेगाव 67
खानापूर 143
पलूस 17
तासगाव 110
जत 104
कवठेमहांकाळ 71
मिरज 166
शिराळा 23
वाळवा 68
सांगली शहर 186
मिरज शहर 74
एकूण 1150