मनपा क्षेत्रात आठ वाढले, ग्रामीण भागात 13 वाढलेः बुधवारी एकाही मृत्यूची नोंद नाही
प्रतिनिधी / सांगली
जिल्ह्यात कोरोनाचे नवे 21 रूग्ण वाढले आहेत. तर 35 रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. महापालिका क्षेत्रात नवीन आठ रूग्ण वाढले तर ग्रामीण भागात 13 वाढले आहेत. बुधवारी एकाही मृत्यूची नोंद नाही. त्यामुळे जिल्ह्याला दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यात सध्या उपचारात अवघे 194 रूग्ण आहेत. कोरोना आता आटोक्यात येवू लागला आहे. रूग्ण वाढीचा दर आता कमी कमी होवू लागला आहे.
महापालिका क्षेत्रात नवीन आठ रूग्ण वाढले आहेत. त्यामध्ये सात रूग्ण सांगली शहरात तर एक रूग्ण मिरज शहरात वाढला आहे. ग्रामीण भागात 13 रूग्ण वाढले आहेत. त्यामध्ये आटपाडी तालुक्यात आठ, कडेगाव तालुक्यात एक रूग्ण वाढला आहे. कवठेमहांकाळ, शिराळा, वाळवा आणि तासगाव तालुक्यात प्रत्येकी एक रूग्ण वाढला आहे. जत, मिरज, खानापूर पलूस या चार तालुक्यात बुधवारी एकही नवीन रूग्ण आढळून आला नाही. त्यामुळे चार तालुक्याला दिलासा मिळाला आहे.
जिल्ह्यात बुधवारी एकाही रूग्णांच्या मृत्यूची नोंद नाही. जिल्ह्यात आजअखेर एक हजार 727 रूग्णांचा कोरोनाने बळी गेला आहे. जिल्ह्याचा मृत्यूदर हा 3.65 टक्के इतका आहे. सध्या जिल्ह्यात उपचारात 194 रूग्ण आहेत. त्यातील 34 रूग्णांची प्रकृती चिंताजनक आहे. बुधवारी 35 रूग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. आजअखेर जिल्ह्यात 45 हजार 518 रूग्ण बरे झाले आहेत. त्यामुळे जिल्हत कोरोनाचा रिकव्हरी रेट 96 टक्केपेक्षा अधिक झाला आहे.
नवे रूग्ण 21
उपचारात 194
बरे झालेले 45518
एकूण 47439
मृत्यू 1727