प्रतिनिधी / सांगली
जिल्ह्यात शनिवारी नवे 250 रूग्ण वाढले. तर 524 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली. उपचार सुरू असताना जिल्ह्यातील 12 जणांचा मृत्यू झाला. तर परजिल्ह्यातील तीन जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्हÎातील आजअखेर एक हजार 512 जणांचा कोरोनाने बळी गेला आहे. जिल्ह्यात आजअखेर 40 हजार 894 रूग्णसंख्या झाली तर त्यामध्ये 34 हजार 837 रूग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.
मनपा क्षेत्रात 45 रूग्ण वाढले
सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका क्षेत्रात नवीन 45 रूग्ण वाढले आहेत. त्यामध्ये सांगली शहरात 34 वाढले तर मिरज शहरात 11 रूग्ण वाढले आहेत. मनपा क्षेत्रात आता रूग्णसंख्या हळूहळू घटू लागली आहे. त्यामुळे महापालिका क्षेत्राला दिलासा मिळाला आहे. आजअखेर महापालिका क्षेत्रात 15 हजार 365 रूग्ण झाले आहेत. यातील 86 टक्केहून अधिक रूग्ण बरे झाले आहेत.
ग्रामीण भागात 205 रूग्ण वाढले
महापालिका क्षेत्राला दिलासा मिळत असतानाच ग्रामीण भागातही आता दिलासा मिळाला आहे. ग्रामीण भागातही शनिवारी 205 रूग्ण वाढले आहेत. यामध्ये आटपाडी तालुक्यात 20, जत तालुक्यात 21, कडेगाव तालुक्यात दहा आणि कवठेमहांकाळ तालुक्यात 11 नवीन रूग्ण वाढले आहेत. खानापूर तालुक्यात 18, मिरज तालुक्यात 19, पलूस तालुक्यात 19 शिराळा तालुक्यात 27 नवीन रूग्ण वाढले आहेत. तासगाव तालुक्यात 18 तर वाळवा तालुक्यात 42 रूग्ण वाढले आहेत. ग्रामीण भागातही आता रूग्ण संख्या घटू लागली आहे.
जिल्ह्यातील 12 जणांचा मृत्यू
जिल्ह्यात शनिवारी उपचार सुरू असताना 12 जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये सांगली शहरात दोन आणि मिरज शहरातील एकाचा मृत्यू झाला आहे. आटपाडी तालुक्यात एकाचा, कडेगाव तालुक्यातील दोघांचा तर कवठेमहांकाळ तालुक्यातील दोघांचा मृत्यू झाला आहे. खानापूर तालुक्यातील एकाचा, पलूस तालुक्यातील एकाचा शिराळा तालुक्यातील एकाचा आणि तासगाव तालुक्यातील एका व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. शनिवारी 12 जणांच्या मृत्यूमुळे आजअखेर जिल्ह्यातील एक हजार 512 जणांचे कोरोनाने बळी गेले आहेत.
तीन हजार 63 जणांचे स्वॅब तपासले
जिल्ह्यातील तीन हजार 63 जणांचे शनिवारी स्वॅब तपासण्यात आले. त्यामध्ये आरटीपीसीतून 835 जणांचे आणि रॅपीड ऍण्टीजनमधून दोन हजार 228 जणांचे स्वॅब तपासण्यात आले आहेत. यामध्ये 250 रूग्णांना कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले.
524 जण कोरोनामुक्त
जिल्ह्यात शनिवारी 524 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. यामुळे आजपर्यंत जिल्ह्यात 34 हजार 837 रूग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. जवळपास 85 टक्के रूग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली असल्याने कोरोनाचे संकट आता कमी होवू लागले आहे. सध्या जिल्ह्यात उपचारात फक्त चार हजार 545 रूग्ण आहेत.
परजिल्ह्यातील 11 रूग्ण दाखल
परजिल्ह्यातील रूग्णांच्यावरही जिल्ह्यात उपचार सुरू आहेत. शनिवारी परजिल्ह्यातील 11 नवीन रूग्ण दाखल झाले आहेत. त्यामध्ये कोल्हापूरचे पाच, बेळगावचे दोन, सिंधुदुर्गचा एक, सातारा येथील एक आणि लातूर येथील दोघांचा समावेश आहे. आजअखेर परजिल्ह्यातील एक हजार 267 रूग्ण दाखल झाले आहेत. त्यामधील एक हजार रूग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. तर 192 जणांचा कोरोनाने बळी गेला आहे. सध्या 75 रूग्णांच्यावर उपचार सुरू आहेत.
नवीन रूग्ण 250
उपचारात 4545
बरे झालेले 34837
एकूण 40894
मृत्यू 1512