प्रतिनिधी / सांगली
बुधवारी जिल्ह्यात कोरोनाचे नवे 451 रूग्ण वाढले. तर 599 रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. जिल्ह्यात आजअखेर 39 हजार 969 रूग्ण झाले आहेत. त्यातील 33 हजार 360 रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. बुधवारी उपचार सुरू असताना जिल्ह्यातील 17 जणांचा मृत्यू झाला. तर परजिल्ह्यातील तिघांचा मृत्यू झाला आहे. आजअखेर जिल्ह्यातील एक हजार 477 रूग्णांचा बळी गेला आहे.
महापालिका क्षेत्रात 66 रूग्ण वाढले
सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका क्षेत्रात बुधवारी अवघे 66 रूग्ण वाढले आहेत. यामध्ये सांगली शहरात 51 तर मिरज शहरात 15 रूग्ण वाढले आहेत. महापालिका क्षेत्रात कोरोना रूग्ण वाढीचा वेग आता अत्यंत कमी झाला आहे. त्यामुळे महापालिका क्षेत्राला चांगला दिलासा मिळाला आहे. महापालिका क्षेत्रात आजअखेर 15 हजार 224 रूग्ण झाले आहेत. यातील जवळपास 83 टक्के रूग्ण बरे झाले आहेत.
ग्रामीण भागात 385 रूग्ण वाढले
महापालिका क्षेत्रात रूग्णवाढीचा वेग कमी झाला आहे. पण ग्रामीण भागात मात्र हा वेग अद्यापही म्हणावा असा कमी झालेला नाही. बुधवारी ग्रामीण भागात 385 नवीन रूग्ण वाढले आहेत. हे वाढलेले रूग्ण तालुकानिहाय असे आटपाडी तालुक्यात 34, जत तालुक्यात 25, कडेगाव तालुक्यात 55, कवठेमहांकाळ तालुक्यात 16, खानापूर तालुक्यात 32 रूग्ण वाढले. मिरज तालुक्यात 39, पलूस तालुक्यात 25 शिराळा तालुक्यात 22 रूग्ण वाढले आहेत. तर तासगाव तालुक्यात 81 नवीन रूग्ण आढळले. वाळवा तालुक्यात 56 रूग्ण वाढले आहेत. ग्रामीण भागात मोठयाप्रमाणात ऍण्टीजन टेस्ट करण्यात येत आहेत त्यामुळे ही रूग्णसंख्या वाढत चालली आहे.
जिल्ह्यातील 17 जणांचा मृत्यू
जिल्ह्यात उपचार सुरू असताना 17 जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये सांगली शहरातील चौघांचा तर मिरज शहरातील दोघांचा मृत्यू झाला आहे. कडेगाव तालुक्यातील दोन जणांचा तर मिरज तालुक्यातील तीन जणांचा मृत्यू झाला आहे. पलूस तालुक्यातील दोघांचा, शिराळा तालुक्यातील एकाचा, तासगाव तालुक्यातील एकाचा आणि वाळवा तालुक्यातील दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. बुधवारी एकूण 17 जणांचा मृत्यू झाला तर आजअखेर जिल्हÎातील एक हजार 477 जणांचा बळी गेला आहे.
परजिल्ह्यातील तिघांचा मृत्यू
परजिल्ह्यातील रूग्णांच्यावरही जिल्ह्यात उपचार करण्यात येतात बुधवारी परजिल्ह्यातील सहा नवीन रूग्ण दाखल झाले. यामध्ये कोल्हापूरचे दोन, औरंगाबादचे तीन आणि सोलापूरचे एक रूग्ण आहेत. आजअखेर परजिल्ह्यातील एक हजार 242 रूग्णांच्यावर उपचार करण्यात आले त्यातील 957 रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर 99 रूग्ण उपचार घेत आहेत. बुधवारी तीन जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील एकाचा तर सातारा जिल्ह्यातील दोघांचा समावेश आहे. आजअखेर 186 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.
599 जण कोरोनामुक्त
बुधवारी जिल्ह्यात उपचार सुरू असताना 599 रूग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. त्यामुळे आजअखेर जिल्ह्यात 33 हजार 360 रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. दररोज वाढणाऱया रूग्णापेक्षा कोरोनामुक्त होणाऱया रूग्णांची संख्या वाढत चालल्याने जिल्ह्याला दिलासा मिळाला आहे.
तीन हजार 636 स्वॅब तपासले
जिल्ह्यात बुधवारी तीन हजार 636 जणांचे स्वॅब तपासले आहेत. त्यातील आरटीपीसीमधुन 907 जणांचे स्वॅब तपासण्यात आले आहेत. तर रॅपीड ऍण्टीजन टेस्टमधून दोन हजार 729 जणांचे स्वॅब तपासण्यात आले आहेत. यामध्ये नवीन 451 रूग्ण आढळून आले आहेत.
नवीन वाढलेले रूग्ण 451
बरे झालेले रूग्ण 33360
उपचारातील रूग्ण 5132
एकूण रूग्णसंख्या 39969
एकूण मृत्यू 1477