मृत्यू 27 : मनपाक्षेत्रात 121 तर ग्रामीण भागात 751 वाढले : जिल्ह्यात दिलासा
प्रतिनिधी / सांगली
जिल्ह्यात कोरोनाची रूग्णसंख्या आता उतरू लागली आहे. जिल्ह्यात रविवारी गेल्या महिन्यानंतर प्रथमच एक हजारपेक्षा कमी रूग्ण वाढले आहेत. तर नवीन रूग्णापेक्षा कोरोनामुक्त होणाऱ्या रूग्णांची संख्या वाढू लागली आहे. हा जिल्ह्यासाठी दिलासा आहे. तसेच पॉझिटिव्ह रेटही आता कमी होताना आढळून येत चालला आहे. जिल्ह्यात रविवारी नवीन कोरोना रूग्ण 872 आढळून आले आहेत. तर कोरोनामुक्त एक हजार 292 झाले आहेत. मृत्यूदर मात्र अद्यापही कमी येताना आढळून येत नाही. रविवारी 27 जणांचा मृत्यू झाला आहे. महापालिका क्षेत्रात 121 तर ग्रामीण भागात 751 रूग्ण वाढले आहेत. उपचारात 12 हजार 105 रूग्ण आहेत
मनपा क्षेत्रात 121 रूग्ण
महापालिका क्षेत्रात रूग्णसंख्या आटोक्यात येत चालली आहे. महापालिका क्षेत्रात नवीन 121 रूग्ण वाढले आहेत. सांगली, मिरज आणि कुपवाड शहरात रूग्णसंख्या कमी झाली होती. रविवारी त्यामध्ये चांगलीच घट दिसून आली आहे. सांगली शहरात 74 तर मिरज शहरात 47 रूग्ण वाढले आहेत. महापालिका क्षेत्रात आजअखेर 27 हजार 887 कोरोनाबाधित रूग्ण आढळून आले आहेत. त्यातील 85 टक्के रूग्ण बरे झाले आहेत.
ग्रामीण भागात 751 रूग्ण
ग्रामीण भागात रूग्णसंख्येचा उद्रेक कमी झाला होता. रविवारी तो चांगलाच कमी आला आहे. ग्रामीणभागात 751 नवीन रूग्ण वाढले आहेत. वाळवा तालुक्यात पुन्हा एकदा कोरोना रूग्णांचा उद्रेक झाला आहे. आटपाडी तालुक्यात 43 तर कडेगाव तालुक्यात 83 रूग्ण वाढले आहेत. खानापूर तालुक्यात 64 तर पलूस तालुक्यात 38 रूग्ण वाढले आहेत. तासगाव तालुक्यात 118 तर जत तालुक्यात 67 रूग्ण आढळून आले आहेत. कवठेमहांकाळ तालुक्यात 41, मिरज तालुक्यात 87 रूग्ण वाढले. शिराळा तालुक्यात 111 रूग्ण वाढले आहेत. वाळवा तालुक्यात 99 रूग्ण वाढले आहेत.
27 जणांचा मृत्यू
जिल्ह्यात 27 जणांचे मृत्यू झाले आहेत. महापालिका क्षेत्रात पाच रूग्णाचा मृत्यू झाला आहे. सांगली शहरात तीन जणांचा तर मिरज शहरातील एकाचा व कुपवाड येथील एका रूग्णांचा मृत्यू झाला आहे. आटपाडी तालुक्यात एक, कडेगाव तालुक्यात दोन, खानापूर तालुक्यात तिघांचा मृत्यू झाला आहे. पलूस तालुक्यात तिघांचा तर तासगाव तालुक्यात चौघांचा मृत्यू झाला आहे. जत तालुक्यात दोघांचा मृत्यू झाला आहे. कवठेमहांकाळ तालुक्यात एकाचा मृत्यू झाला आहे. मिरज तालुक्यात तीन रूग्णांचा मृत्यू झाला आहे. वाळवा तालुक्यात तीन रूग्णांचा मृत्यू झाला आहे.
1292 रूग्णांची कोरोनावर मात
जिल्ह्यात कोरोनाचे उपचार सुरू असणारे एक हजार 292 रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आजअखेर जिल्हÎात एक लाख 17 हजार 386 रूग्ण कोरोनाबाधित झाले आहेत. तर त्यातील एक लाख एक हजार 880 रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. कोरोनामुक्त रूग्णसंख्या वाढत चालली आहे. त्यामुळे जिल्हÎाला दिलासा मिळाला आहे. लाखापेक्षा अधिक रूग्ण बरे झाले आहेत.
नवे रूग्ण 872
उपचारात 12105
बरे झालेले 101880
एकूण 117386
मृत्यू 3401
रविवारचे बाधित रूग्ण
तालुका आटपाडी कडेगाव खानापूर पलूस तासगाव जत कवठेमहांकाळ मिरज शिराळा वाळवा सांगली शहर मिरज शहर एकूण | रूग्ण 43 83 64 38 118 67 41 87 111 99 74 47 872 |
आजचे लसीकरण 2321
एकूण लसीकरण 700096
कोरोना चाचणी – 4947