प्रतिनिधी / सांगली
जिल्ह्यातकोरोनाचा हाहाकार सुरूच आहे. शुक्रवारी नवे एक हजार 280 रूग्ण वाढले आहेत. जिल्ह्यातमृत्यूचे तांडव वाढतच चालले आहे जिल्ह्यातशुक्रवारी 24 जणांचा मृत्यू झाला आहे.महापालिका क्षेत्रात 203 तर ग्रामीण भागात तब्बल एक हजार 77 रूग्ण वाढले आहेत. उपचार सुरू असणारे एक हजार 77 रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. उपचारात 13 हजार 148 रूग्ण आहेत..
महापालिका क्षेत्रात 203 रूग्ण वाढले
महापालिका क्षेत्रात रूग्णसंख्या आता मोठÎाप्रमाणात वाढत चालली आहे. महापालिका क्षेत्रात नवीन 203 रूग्ण वाढले आहेत. सांगली, मिरज आणि कुपवाड शहरात दिवसेंदिवस ही रूग्णसंख्या वाढतच चालली आहे. सांगली शहरात 132 तर मिरज शहरात 71 रूग्ण वाढले आहेत. महापालिका क्षेत्रात आजअखेर 22 हजार 566 कोरोनाबाधित रूग्ण आढळून आले आहेत. त्यातील 72 टक्के रूग्ण बरे झाले आहेत. तर उपचारातील रूग्णसंख्येचा आकडा वाढतच चालला आहे.
ग्रामीण भागात 1077 रूग्ण वाढले
ग्रामीण भागात रूग्णसंख्येचा उद्रेक सुरू झाला आहे. जिल्हÎातील प्रत्येक तालुक्यात रूग्णसंख्या वाढतच चालली आहे. रूग्ण आटोक्यात येण्याची कोणतीही चित्र दिसून येत नाही. प्रत्येक तालुक्यात रूग्णसंख्या वाढतच चालली आहे. आटपाडी तालुक्यात 160 तर कडेगाव तालुक्यात 27 रूग्ण वाढले आहेत. खानापूर तालुक्यात 100 तर पलूस तालुक्यात 19 रूग्ण वाढले आहेत. तासगाव तालुक्यात 116 तर जत तालुक्यात 225 रूग्ण आढळून आले आहेत. कवठेमहांकाळ तालुक्यात 60, मिरज तालुक्यात 142 रूग्ण वाढले. शिराळा तालुक्यात 26 तर वाळवा तालुक्यात 202 रूग्ण वाढले आहेत.
24 जणांचे मृत्यू
जिल्ह्यातशुक्रवारी 24 जणांचे मृत्यू झाले आहेत. महापालिका क्षेत्रात तब्बल सात रूग्णांचा मृत्यू झाला आहे. सांगली शहरातील तीन आणि मिरज शहरातील चौघांचा मृत्यू झाला आहे. आटपाडी तालुक्यात एक तर कडेगाव तालुक्यात एक रूग्णांचा मृत्यू झाला आहे. पलूस तालुक्यात एक तर तासगाव तालुक्यात पाच रूग्णांचा मृत्यू झाला आहे. कवठेमहांकाळ तालुक्यात दोन तर मिरज तालुक्यात दोन तर वाळवा तालुक्यात पाच जणांचा मृत्यू झाला आहे.
तब्बल 1026 रूग्णांची कोरोनावर मात
जिल्ह्यातकोरोनाचे उपचार सुरू असणारे 1026 रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आजअखेर जिल्ह्यात75 हजार 678 रूग्ण कोरोनाबाधित झाले आहेत. तर त्यातील 60 हजार 264 रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
आज लसीकरण होणार नाही
जिल्ह्यातलसीकरण करण्यासाठी लस उपलब्ध नसल्याने शनिवारी कोणत्याही लसीकरण केंद्रावर लस दिली जाणार नसल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय साळुंखे आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलिंद पोरे यांनी दिली आहे. जिल्ह्यातआजअखेर साडेपाच लाख नागरिकांना लस देण्यात आली आहे. शासनाकडून लस प्राप्त झाल्यावरच लसीकरण होणार आहे.
नवे रूग्ण 1280
उपचारात 13148
बरे झालेले 60264
एकूण 75678
मृत्यू 2266
शुक्रवारचे बाधित रूग्ण
तालुका रूग्ण
आटपाडी 160
कडेगाव 27
खानापूर 100
पलूस 19
तासगाव 116
जत 225
कवठेमहांकाळ 60
मिरज 142
शिराळा 202
सांगली शहर 132
मिरज शहर 71
एकूण 1280
आजचे लसीकरण 20987
एकूण लसीकरण 560517