प्रतिनिधी / सांगली
जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टी व महापुरामुळे सांगली जिल्ह्यात शेतीचे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यात येत असून जिल्हयात महापूरामुळे बाधित झालेल्या 5 तालुक्यांतील 224 गावांमधील आतापर्यंत 74 हजार 782 शेतकऱ्यांच्या 27 हजार 590 हेक्टर जमीनींचे पंचनामे पुर्ण झाली आहेत. उर्वरित शेतीचे पंचनामे युध्दपातळीवर पुर्ण करण्यासाठी यंत्रणा गतीने कार्यरत असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी सांगितले आहे.
जिल्ह्यात महापुरामुळे तसेच अतिवृष्टीमुळे, ओढ्यांना जादा पाणी आल्याने मिरज, वाळवा, पलूस, तासगाव व शिराळा या पाच तालुक्यातील 247 गावे बाधित झाले आहेत. शासन निर्देशानुसार बाधित गावातील नुकसान झालेल्या शेतीचे पंचनामे युद्धपातळीवर करण्यात येत आहेत. यामध्ये मिरज तालुक्यातील 26 गावे बाधित झाली असून त्यापैकी 26 गावांतील 17 हजार 544 शेतकऱ्याचे 7 हजार 740 हेक्टरचे प्रत्यक्ष पंचनामे पुर्ण झाली आहेत. वाळवा तालुक्यातील 98 गावे बाधित झाली असून त्यापैकी 76 गावांतील 27 हजार 619 शेतकऱ्याचे 10 हजार 797 हेक्टरचे प्रत्यक्ष पंचनामे पुर्ण झाली आहेत. शिराळा तालुक्यातील 95 गावे बाधित झाली असून त्यापैकी 95 गावांतील 19 हजार 172 शेतकऱ्याचे 3 हजार 932 हेक्टरचे प्रत्यक्ष पंचनामे पुर्ण झाली आहेत. पलूस तालुक्यातील 26 गावे बाधित झाली असून त्यापैकी 25 गावांतील 10 हजार 374 शेतकऱ्याचे 5 हजार 88 हेक्टरचे प्रत्यक्ष पंचनामे पुर्ण झाली आहेत. तासगाव तालुक्यातील 2 गावे बाधित झाली असून तेथील 73 शेतकऱ्याचे 31.92 हेक्टरचे प्रत्यक्ष पंचनामे पुर्ण झाली आहेत.
महापूरामुळे जमीन खरडून गेलेल्या 181 गावातील 4 हजार 190 शेतकऱ्यांच्या 455 हेक्टर क्षेत्रापैकी 4 हजार 561 शेतकऱ्यांचे 308 हेक्टरचे पंचानामे पूर्ण झाले आहेत. गाळ साचलेल्या 3 हजार 818 शेतकऱ्यांच्या 470 हेक्टर क्षेत्रापैकी 1 हजार 463 शेतकऱ्यांचे 107 हेक्टरचे पंचानामे पूर्ण झाले आहेत.
अतिवृष्टी व पुरस्थितीमुळे 4 तालुक्यातील 113 गावे बाधित झाली असून 34 हजार 832 कुटंबांचे पंचनामे झाली आहेत. पंचनामे झाल्यानूसार पुर्णत: नष्ट झालेली कच्ची घरे 446 व पक्की घरे 134 तर अंशत: नष्ट झालेली कच्ची घरे 1762 व पक्की घरे 772 आहेत. 39 झोपड्या व 948 गोठ्यांचेही नुकसान झाले आहे. आज अखेर 108 लहान मोठी जनावरे व 49 हजार 508 कुकुटपक्षांचे पंचनामे झाले आहेत. अशीही माहिती यावेळी जिल्हाधिकारी चौधरी यांनी दिली आहे.