सांगली जिल्ह्यात 10 जणांचा मृत्यूः मनपा क्षेत्रात 47 वाढलेः ग्रामीण भागात 184 वाढले
प्रतिनिधी / सांगली
जिल्ह्यात शुक्रवारी नवीन 231 रूग्ण वाढले. यामध्ये महापालिका क्षेत्रात 47 तर ग्रामीण भागात 184 रूग्ण वाढले आहेत. पण यापेक्षा अधिक रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. शुक्रवारी 335 जण कोरोनामुक्त झाले आहेत. उपचार सुरू असताना मात्र जिल्हÎातील 10 जणांचा मृत्यू झाला आहे. आजअखेर जिल्ह्यातील एक हजार 560 जणांचा कोरोनाने बळी गेला आहे.
महापालिका क्षेत्राला दिलासा
जिल्ह्यात महापालिका क्षेत्रात आता कोरोना हटू लागला आहे. सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका क्षेत्रात शुक्रवारी नवीन 47 रूग्ण वाढले आहेत. यामध्ये सांगली शहरात 33 तर मिरज शहरात 14 रूग्ण वाढले आहेत. त्यामुळे मनपा क्षेत्रातील रूग्णवाढीचा दर आता अत्यंत कमी झाला आहे. आजअखेर महापालिका क्षेत्रात 15 हजार 687 रूग्ण आढळून आले आहेत. यातील 88 टक्के रूग्ण बरे झाले आहेत.
ग्रामीण भागात अवघे 184 रूग्ण वाढले
महापालिका क्षेत्राबरोबरच आता ग्रामीण भागालाही चांगलाच दिलासा मिळाला आहे. ग्रामीण भागातही रूग्णसंख्या वाढीचा दर घटू लागला आहे. शुक्रवारी ग्रामीण भागात रूग्ण वाढीमध्ये वाळवा आणि खानापूर तालुक्यात सर्वाधिक रूग्ण वाढले आहेत. या दोन्ही तालुक्यात प्रत्येकी 36 रूग्ण वाढले आहेत. तर आटपाडी तालुक्यात 11, जत तालुक्यात 17, कडेगाव तालुक्यात 16 तर कवठेमहांकाळ तालुक्यात अवघे आठ रूग्ण वाढले आहेत. पलूस तालुक्यात 10 मिरज तालुक्यात 16, शिराळा तालुक्यात 19 तर तासगाव तालुक्यात 15 रूग्ण वाढले आहेत.
तासगाव तालुक्यात तीन बळी
जिल्ह्यात उपचार सुरू असताना एकूण दहा जणांचा बळी गेला आहे. यामध्ये तासगाव तालुक्यातील तिघांचा बळी गेला आहे. वाळवा आणि पलूस तालुक्यात प्रत्येकी दोघांचा बळी गेला आहे. मिरज शहरातील एकाचा, जत तालुक्यातील एकाचा आणि कडेगाव तालुक्यातील एकाचा असा एकूण दहा जणांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला आहे. आजअखेर जिल्हÎात एक हजार 560 जणांचा कोरोनाने बळी गेला आहे.
335 जण कोरोनामुक्त
जिल्ह्यातील 335 जण शुक्रवारी कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात आजअखेर 37 हजार 438 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. कोरोनाचा जिल्ह्यातील रिकव्हरी रेट आता 87 टक्के झाला आहे. ही अत्यंत दिलासा देणारी गोष्ट जिल्हÎासाठी आहे. जिल्ह्यात गेल्या महिन्याभरापासून कोरोना रूग्णवाढीच्या दरापेक्षा कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले आहे.
परजिल्ह्यातील पाच रूग्ण वाढले
परजिल्ह्यातील रूग्णांच्यावरही जिल्ह्यात उपचार सुरू आहेत. शुक्रवारी नवीन पाच रूग्ण वाढले आहेत. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील दोन, बेळगाव जिल्ह्यातील दोन आणि सोलापूर जिल्ह्यातील एकाचा समावेश आहे. यामुळे परजिल्ह्यातील एकूण रूग्णसंख्या एक हजार 296 झाली आहे. तर बरे झालेले रूग्ण एक हजार 66 आहेत. उपचारात 29 रूग्ण आहेत. उपचार सुरू असताना शुक्रवारी सातारा जिल्ह्यातील एकाचा मृत्यू झाला आहे. आजअखेर परजिल्ह्यातील 201 जणांचा कोरोनाने बळी गेला आहे.
दोन हजार 519 जणांचे स्वॅब तपासले
जिल्ह्यात शुक्रवारी दोन हजार 519 जणांचे स्वॅब तपासण्यात आले आहेत. यामध्ये आरटीपीसीमध्ये 667 तर रॅपीड ऍण्टीजनमध्ये एक हजार 852 जणांचे स्वॅब तपासण्यात आले आहेत यात नवीन 231 रूग्ण वाढले आहेत.
नवीन रूग्ण 231
उपचारात 3474
बरे झालेले 37438
एकूण 42472
मृत्यू 1560