30 जणांचे मृत्यूः मनपा क्षेत्रात 133 वाढलेः ग्रामीण भागात 482 रूग्ण वाढलेः आजअखेर 23 हजार 921 रूग्ण कोरोनामुक्त
प्रतिनिधी / सांगली
शनिवारी सांगली जिल्ह्यात 728 रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. नवे 615 रूग्ण वाढले जिल्हÎात आजअखेर 23 हजार 921 रूग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. पण उपचार सुरू असताना 30 जणांचे मृत्यू झाले आहेत. त्यामध्ये जिल्हÎातील 26 आणि परजिल्हÎातील चौघांचा समावेश आहे. एकूण जिल्हÎात 1259 जणांचा आजअखेर कोरोनाने बळी गेला आहे.
महापालिका क्षेत्रात 133 रूग्ण वाढले
महापालिका क्षेत्रात नवीन 133 रूग्ण वाढले आहेत. त्यामध्ये सांगली शहरात 86 तर मिरज शहरात 47 रूग्ण वाढले आहेत. महापालिका क्षेत्रात आता घर टू घर सर्व्हे सुरू करण्यात आला आहे. तसेच ज्यांना कोरोनाची लक्षणे दिसत आहेत. तसेच कोरोना रूग्णांच्या संपर्कात जे आले आहेत. त्यांची तपासणीही सुरू करण्यात आली आहे. महापालिका क्षेत्रात आजअखेर एकूण रूग्णसंख्या 13 हजार 143 झाली आहे.
ग्रामीण भागात 482 रूग्ण वाढले
ग्रामीण भागात नवे 482 नवे रूग्ण आढळून आले आहेत. ग्रामीण भागात मोठÎा संख्येने रॅपीड ऍण्टीजन टेस्ट सुरू केल्याने ही रूग्णसंख्या वाढत आहे. तालुकानिहाय वाढलेली रूग्णसंख्या अशी, आटपाडी तालुक्यात 31, जत तालुक्यात 28, कडेगाव तालुक्यात 35 नवीन रूग्ण वाढले आहेत. कवठेमहांकाळ तालुक्यात 40, खानापूर तालुक्यात 59, मिरज तालुक्यात 49 रूग्ण वाढले आहेत. पलूस तालुक्यात 35, शिराळा तालुक्यात 40, तासगाव तालुक्यात 53 आणि वाळवा तालुक्यात 112 रूग्ण वाढले आहेत.
जिल्ह्यातील 26 जणांचा मृत्यू
जिल्हÎातील 26 जणांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला आहे. यामध्ये सांगली शहरातील चार जणांचा मृत्यू झाला आहे. मिरज शहरातील सहा जणांचा आणि कुपवाड येथील एकाचा मृत्यू झाला. आटपाडी तालुक्यातील एकाचा, जत तालुक्यातील एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. कवठेमहांकाळ तालुक्यातील दोघांचा, खानापूर तालुक्यातील एकाचा, मिरज ग्रामीण भागातील एकाचा मृत्यू झाला. पलूस तालुक्यातील तिघांचा, तासगाव तालुक्यातील दोघांचा मृत्यू झाला. वाळवा तालुक्यातील चार जणांचे उपचार सुरू असताना मृत्यू झाले आहेत. जिल्हÎातील एकूण 26 जणांचा शनिवारी मृत्यू झाला आहे. आजअखेर 1259 जणांचे मृत्यू झाले आहेत.
परजिल्ह्यातील नवे 22 रूग्ण दाखल
परजिल्हÎातील नवीन 22 रूग्ण जिल्हÎात उपचारासाठी दाखल झाले आहेत. त्यामध्ये कोल्हापूरचे सात, बेळगावचे नऊ, सोलापूरचे तीन आणि साताऱयाचे तीन रूग्ण दाखल झाले आहेत. त्यामुळे जिल्हÎात आजअखेर परजिल्हÎातील 1054 जणांच्यावर उपचार करण्यात आला त्यातील 637 जण कोरोनामुक्त होवून गेले तर 241 जणांच्यावर आता उपचार सुरू आहेत. शनिवारी चार जणांचा मृत्यू झाला त्यामध्ये कोल्हापूर जिल्हÎातील दोघांचा सातारा येथील एकाचा आणि बेळगाव जिल्हÎातील एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर आजअखेर 176 जणांचा मृत्यू झाला आहे.
23 हजार 921 जणांची कोरोनावर यशस्वी मात
जिल्हÎात शनिवारी 728 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. सलग सातव्या दिवशी वाढलेल्या नवीन रूग्णांपेक्षा कोरोनामुक्त रूग्णांची संख्या अधिक असल्याने जिल्हÎाला दिलासा मिळत चालला आहे. जिल्हÎात आजअखेर बरे झालेल्या रूग्णांची संख्या ही 23 हजार 921 झाली आहे. जवळपास 71 टक्के रूग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. जिल्हÎात मोठÎाप्रमाणात रूग्ण वाढत असतानाच कोरोनामुक्त होणारे रूग्णही वाढत चालल्याने जिल्हÎाला हा मोठा दिलासा मिळत आहे. त्यामध्ये सलग सात दिवस वाढलेल्या रूग्णांपेक्षा कोरोनामुक्त झालेल्या रूग्णांची संख्या मोठÎाप्रमाणात आहे. त्यामुळे आता जिल्हयाला चांगलाच दिलासा मिळत चालला आहे.
2542 जणांचे स्वॅब तपासले
जिल्हÎात शनिवारी दोन हजार 542 जणांचे स्वॅब तपासले आहेत. यामध्ये आरटीपीसी मधील 734 स्वॅब तपासणी केली तर रॅपीड ऍण्टीजन टेस्टमध्ये एक हजार 808 जणांची तपासणी करण्यात आली आहे. यामध्ये नवीन 615 रूग्ण आढळून आले आहेत.
कोरोनाची जिल्ह्यातील स्थिती
एकूण रूग्ण 33447
बरे झालेले 23921
उपचारात 8267
मयत 1259