सांगली : प्रतिनिधी
त्रिपुरा येथे घडलेल्या घटनेच्या अनुषंगाने रझा अकादमीने पुकारलेल्या बंद दरम्यान घडलेल्या घटनेचे पडसाद उमटून महाराष्ट्रात अमरावती, नांदेड, मालेगाव, पुसद व कारंजा या ठिकाणी जातीय हिंसाचार झालेला आहे. यापूर्वीची पार्श्वभूमी पाहता सांगली जिल्ह्यामध्ये या घटनेचा फायदा घेवून काही समाज कंटक दोन समाजामध्ये, गटांमध्ये तेड निर्माण करण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासाठी जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी 20 नोव्हेंबर अखेर जमावबंदीचा आदेश लागू केला आहे. या आदेशानुसार पाच व पाच पेक्षा जास्त लोकांना एकत्र येणे, सभा घेणे, तसेच शस्त्र, लाठी, काठी बाळगण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. दरम्यान या पार्श्वभूमीवर पोलिसांच्या वतीने सांगली शहरातील प्रमुख मार्गावरून संचलन करण्यात आले.