जिल्ह्यातील 17 जणांचा मृत्यूः मनपा क्षेत्रात 81 वाढलेः ग्रामीण भागात 277 रूग्ण वाढले
प्रतिनिधी/सांगली
मंगळवारी जिल्ह्यात नवीन 358 रूग्ण वाढले. तर 583 जण कोरोनामुक्त झाले आहेत. 20 जणांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. त्यामध्ये जिल्ह्यातील 17 जणांचा समावेश आहे. तर परजिल्ह्यातील तिघांचा मृत्यू झाला. एकूण रूग्णसंख्या 39 हजार 518 झाली आहे. तर आजअखेर कोरोनामुक्त झालेले रूग्ण 32 हजार 544 झाले आहेत.
महापालिका क्षेत्रात 81 रूग्ण वाढले
सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका क्षेत्रात नवीन 81 रूग्ण वाढले आहेत. त्यामध्ये सांगली शहरात 45 रूग्ण वाढले तर मिरज शहरात 36 रूग्ण वाढले आहेत. महापालिका क्षेत्रात आता नवीन रूग्ण वाढण्याची गती अत्यंत कमी झाली आहे. त्यामुळे मनपा क्षेत्राला दिलासा मिळाला आहे. महापालिका क्षेत्रात आजअखेर 15 हजार 158 रूग्ण कोरोनाबाधित झाले आहेत. यातील जवळपास 82 टक्के रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
ग्रामीण भागात 277 रूग्ण वाढले
जिल्ह्यातील ग्रामीण भागात नवीन 277 रूग्ण वाढले आहेत. ग्रामीण भागातही रूग्ण वाढीचा वेग आता आटोक्यात येत चालला आहे. सरासरी 200 ते 300 अशी आता ही आकडेवारी येत चालली आहे. पंधरा दिवसापुर्वीच ही सरासरी 500 ते 600 अशी होती. त्यामध्ये जवळपास निम्म्याहून अधिक संख्येने रूग्ण घटले आहेत. मंगळवारी वाढलेले तालुकानिहाय रूग्ण असे आटपाडी तालुक्यात 27, जत तालुक्यात 26, कडेगाव तालुक्यात 51 आणि कवठेमहांकाळ तालुक्यात 10 रूग्ण वाढले. खानापूर तालुक्यात 24, मिरज तालुक्यात 27, पलूस तालुक्यात 23, शिराळा तालुक्यात 11 रूग्ण वाढले आहेत. तासगाव तालुक्यात चार आणि वाळवा तालुक्यात 74 रूग्ण वाढले आहेत.
जिल्ह्यातील 17 जणांचा मृत्यू
जिल्ह्यात कोरोनामुक्त होणाऱयांची संख्या वाढत चालली आहे. पण उपचारादरम्यान बळी जाणाऱयांची संख्या मात्र कमी होत नाही. मंगळवारीही जिल्हÎातील 17 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. यामध्ये सांगली शहरात एक, मिरज शहरात दोन जणांचा मृत्यू झाला. आटपाडी तालुक्यात एकाचा, कडेगाव तालुक्यात एकाचा तर कवठेमहांकाळ तालुक्यात दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. खानापूर तालुक्यात तीन जणांचा, तर मिरज तालुक्यातील दोन जणांचा मृत्यू झाला आहे. पलूस तालुक्यातील एकाचा, तासगाव तालुक्यातील एकाचा आणि वाळवा तालुक्यातील तिघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. मंगळवारी एकूण 17 जणांचा मृत्यू झाला आहे. आजअखेर जिल्हÎात एक हजार 460 जणांचा कोरोनाने बळी गेला आहे.
परजिल्ह्यातील तिघांचा मृत्यू
जिल्ह्यात मंगळवारी परजिल्ह्यातील नवीन तीन रूग्ण दाखल झाले आहेत. त्यामध्ये कोल्हापूर, सातारा आणि बेळगाव येथील प्रत्येकी एक रूग्ण दाखल झाला आहे. आजअखेर परजिल्ह्यातील एक हजार 236 रूग्णांच्यावर उपचार करण्यात आले त्यामध्ये 939 रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर 114 रूग्णांच्यावर उपचार सुरू आहेत. मंगळवारी तीन रूग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला त्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील दोघांचा आणि सातारा जिल्ह्यातील एकाचा समावेश आहे. आजअखेर परजिल्ह्यातील 183 रूग्णांचा बळी गेला आहे.
32 हजार 544 रूग्ण कोरोनामुक्त
जिल्ह्यात मंगळवारी 583 रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे आजअखेर जिल्ह्यातील 32 हजार 544 रूग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. त्यामुळे रूग्ण बरे होणाऱयांची संख्या वाढली आहे. जवळपास 83 टक्के रूग्णांनी कारोनावर मात केली आहे. ही जिल्ह्याला दिलासा देणारी गोष्ट आहे.
दोन हजार 860 जणांचे स्वॅब तपासले
मंगळवारी जिल्ह्यात दोन हजार 860 जणांचे स्वॅब तपासण्यात आले आहेत. त्यामध्ये आरटीपीसीच्या मार्फत 840 जणांचे स्वॅब तपासण्यात आले आहेत. तर रॅपीड ऍण्टीजन टेस्टच्या माध्यमातून दोन हजार 20 जणांचे स्वॅब तपासले आहेत. यातील 358 जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत.
नवीन रूग्ण 358
उपचारातील रूग्ण 5514
बरे झालेले रूग्ण 32544
एकूण रूग्ण 39518
एकूण बळी 1460