प्रतिनिधी / नांद्रे
नांद्रे.ता.मिरज येथील शेतकरी महापूर, अतिवुष्ठि, अवकाळी, कोरोना, लॉकडाऊन, नोटा बंदी, आदी संकटाने मेटाकुटीला आला आहे. यातच बँकांनी भोगवाट वर्ग 2 या नावाखाली पिक कर्ज, सामान्य कर्ज, व आदी कर्ज देण्याचे बंद करून शेतकरी विरोधी धोरण आखल्याने शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे.
एका बाजूला राज्य सरकार शेतकर्यांना 3 लाखापर्यंत बिनव्याजी पिककज देणार आसल्याचे अथमंञी अजीत पवार यांनी घोषणा केली आहे,तर जिल्हा बँकेचे चेअरमन दिलीप तात्या पाटील यांनी शेतकर्याना बिन व्याजी 5 लाख कर्ज देण्याची घोषणा जिल्हा बँकेच्या सभेत केली असली तरी भोगवाट वग 2 या शेतकर्यानां कर्ज पुरवठाच बंद केल्यामुळे आम्हा शेतकर्यानी जगावे कि मरावे अशी स्थिती निर्माण झाली आहे, अशा प्रकारे किमान 300 शेतकरी नांद्र्यात शेतकरी बँकाच्या चक्रव्यूहात आडकून राहिला आहे.