दिघंची / वार्ताहर
आटपाडी तालुक्यातील दिघंची जवळ असणाऱ्या पुजारवाडी (दि) येथे गुरुवारी दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास वीज अंगावर पडून खिलार जातीचा बैल जागीच ठार झाला.
पुजारवाडी येथील शेतकरी विलास श्रीमंत मोरे यांची खिलार जातीच्या बैलांची जोडी आहे. उन्हाचा तडाखा जास्त असल्याने त्यांनी बैल साऊलीसाठी घरासमोरील लिंबाच्या झाडाला बांधली होती. परंतु गुरुवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास पुजारवाडी (दि) परिसरात वादळी वारे व विजांच्या कडकडाटसह जोरात पाऊस झाला.त्यावेळी अंगावर वीज पडल्याने जातिवंत खिलारी जातीचा बैल जागीच ठार झाला. बैल ठार झाल्याने विलास पाटील यांचे सुमारे एक लाख रुपयांचे नुकसान झाले.सदर घटनेनंतर मृत बैलाचा पंचनामा करण्यात आला.
यावेळी बोलताना नितीन भरगुडे पाटील म्हणाले काही लोकप्रतिनिधी म्हणतात की औद्योगिकीकरणामुळे खंडाळा हा राज्यातील सर्वात श्रीमंत तालुका आहे. मात्र नक्की श्रीमंती कुठं आहे. तालुक्यातील सोशीक जनतेचा अंत पाहु नका. तरुणांचा कोरोनामुळे मृत्यू होत आहे. तरूणांचा जीव वाचला पाहिजे, खंडाळ्यातील सर्वसामान्य जनतेने केलेला त्याग विसरून चालणार नाही.
खंडाळा तालुक्यासाठी स्वतंत्र कोविड सेंटर उभारून कंपन्यांनी आरोग्य सुविधा दिल्याच पाहिजेत.कंपनी कामगारांमुळे होणारा संसर्ग टाळण्यासाठी कंपन्या पंधरा दिवस बंद ठेवा. अत्यावश्यक सेवेतील कारखाने चालु ठेवा. त्या कामगारांची सोय कंपनीने करावी. मागील काळात सुरु केलेली कोरोना केअर सेंटर पुन्हा कार्यान्वित करावीत.