प्रतिनिधी / सांगली
आज सांगली येथे विनाकारण फिरणारे व गर्दीच्या ठिकाणी पोलिसांची कारवाई तसेच रस्त्यावरील हातगाडी व भाजी विक्रेते हाटवले पण ही कारवाई काही काळापुरतीच मर्यादित राहिली असून मारुती रोड व बालाजी चौकात पुन्हा हात गाडे व नागरिकांची गर्दी दिसून आली.
पालकमंत्री जयंत पाटील यांनी कडक जनता कर्फ्यू पाळावा असे आवाहन जनतेला केले होते. मात्र, या जनता कर्फ्यूचा फज्जा उडाला पण भाजी मंडई येथे कडक बंद पाळण्यात आला. व्यापाऱ्यांनी मात्र दुकाने उघडी ठेवली. त्यामुळे आता या परस्थितीवर नियंत्रण आणण्यासाठी विनाकारण फिरणार्यांवर आणि जनता कर्फ्यूच्या नियमांच उल्लंघन करणार्या नागरिकांवर पोलिसांनी कारवाईला सुरुवात करत हा जनता कर्फ्यू आपल्या हाती घेतला आहे.