वार्ताहर / बागणी
येथील रवींद्र चव्हाण यांच्याकडे सुरुवातीस ३० ते ४० लोकांची रेशनकार्ड नाव वाढवणे, कमी करणे, फोड करणे अशा विविध कामासाठी कार्ड धारकांनी दिलेली कार्ड चव्हाण यांनी इस्लामपूर पुरवठा विभागाकडे ६ ऑगस्ट रोजी जमा केली होती. सध्या ती गेली ६ महिने झाले हि कार्डे धूळ खात ऑफिसमध्ये पडली आहेत. यावर कोणीच भाषा करण्यास तयार नाही.
रवींद्र चव्हाण यांच्या रेशन दुकानाला त्रुटी असल्याने पुरवठा विभागाने हे रेशनिंग दुकान सील केले आणि चव्हाण यांच्याकडून काढून घेऊन माळवाडी मजूर सोसायटीला चाललाय दिले आहे. कार्ड बाबत लोकांनी विचारणा केली असता चव्हाण हे सांगतात की आता माझा काय संबंध नाही. तर माळवाडी मजूर सोसायटीची दोन दुकाने व चव्हाण यांचे एक दुकान असे तीन दुकाने सध्या वंजाळे यांच्याकडे चालवाय दिली आहेत. या बाबत त्यांना विचारले असता कार्ड माझ्याकडे जमा केली नाहीत त्यामुळे माझा काय संबंध नाही असे ते सांगता. मग ह्या कार्डाची जबाबदारी कोणाची हा प्रश्न सध्या कार्ड धारकांना पडला आहे.
इस्लामपूर पुरवठा विभागात चौकशी केली असता तेथील अधिकारी यांनी वंजाळे याना सदरची कार्डे घेऊन जावा व ग्राहकांना परत करण्याच्या सूचना देऊन देखील ते अधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवत आहेत. कार्ड धारकांनी अनेक कामासाठी साध्य कार्ड लागत आहेत. पण जबाबदारी स्वीकारण्यास कोणीच तयार नसल्याने कार्ड धारकालाच स्वता जाऊन आता इस्लामपूरला कार्ड घेऊन यावे लागणार आहे. या बाबत तालुका पुरवठा अधिकारी करे यांनी लक्ष घालून हा गोंधळ सोडवावा व संबंधित रेशन दुकानदारास आदेश देऊन कार्ड गावातच वाटप करावीत अशी मागणी कार्ड धारक करत आहेत.