शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडी राज्य सरकारने तालिबानी पद्धतीने लोकशाहीची मूल्ये पायदळी तुडवून काल विधानसभा अधिवेशनात गोंधळाचे खोटे निमित्त करून, भाजपाच्या १२ आमदारांना एक वर्षांसाठी निलंबित केले. हा लोकशाहीचा खून आहे. ठाकरे सरकारने लोकशाही मूल्यांना पायदळी तुडवायचे धोरण सातत्याने अवलंबले आहे.
ठाकरे सरकार जेव्हापासून सत्तेवर आले आहे तेव्हापासून सातत्याने महिला अत्याचार, शेतकरी विरोधी धोरण, लॉकडाऊनच्या काळामध्ये १२ बलुतेदार लोकांच्यावर अन्याय, ओबीसी आरक्षण व मराठा आरक्षण या सर्व गोष्टींमध्ये अपयशी ठरले आहे.
भाजपाचे संख्याबळ कमी करण्यासाठी व ओबीसींची मुस्कटदाबी करण्यासाठी सत्ताधारी आघाडी सरकारचे षडयंत्र आहे. सभागृहाची पायमल्ली करणाऱ्या व लोकशाहीचा खून करणाऱ्या आघाडी सरकारचा सांगली जिल्हा (ग्रामीण) भाजपाच्या वतीने तीव्र निषेध करण्यात आला. भाजपाच्या व सर्वसामान्य जनतेच्या भावना आघाडी सरकारला समजण्यासाठी भाजपाचे जिल्हाध्यक्ष मा. आमदार पृथ्वीराज बाबा देशमुख यांच्या हस्ते जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांना निवेदन देण्यात आले.