मिरजेत जनता कर्फ्यु न पाळणाऱ्या 50 जणांवर कारवाई
प्रतिनिधी / मिरज
कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस भयावह व विक्राळ रूप धारण करीत आहे. त्यामुळे नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करून कडक जनता कर्फ्युची अंमलबजावणी करण्याची गरज आहे. नियम मोडून मोकाट फिरत मजा-मस्ती करणाऱ्या नागरिकांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यासह वाहने जप्त करावी, असे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी पोलीस अधिकाऱ्यांना दिले. दरम्यान, जिल्हा पोलिस प्रमुखांनी गुरुवारी सकाळी शहरात जनता कर्फ्युची पाहणी केली. यावेळी 50 हुन अधिक नागरिकांवर कारवाई करण्यात आली.
वाढत्या कोरोना पार्श्वभूमीवर संपूर्ण जिल्ह्यात टाळेबंदी लावण्यात आली आहे. कोरोनाचा पूर्णत: नायलाट करण्यासाठी नागरिकांनी पोलिस प्रशासनाला सहकार्य करावे, आपल्या सहकार्याने आपण मिळून कोरानावर मात करू, असे आवाहनही सांगली जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी केले आहे.