संचालक नातेवाईक, कुटुंबीयाच्या नावे असलेले कर्ज : `तरुण भारत’च्या दणक्याने बँकेचे कोटÎवधी वाचले
प्रतिनिधी / सांगली
जिल्हा बँकेच्या कारभाऱ्यांनी संचालकांचे नातेवाईक, कुटुंब, बचत गट आदींच्या संबंधित असलेल्या संस्था आणि व्यक्तींचे व्याजासह थकीत असलेले सुमारे 91 कोटीचे नियमबाह्यपणे माफ केले होते. हे कर्ज पुन्हा संबंधितांच्या कर्जखात्यावर थकीत दाखविले आहे. यामुळे बँकेचे कोटÎवधी रुपये वाचले आहे. `तरुण भारत’ने बँकेच्या कारभारावर उठविलेल्या आवाजामुळेच बँकेचे कोट्यावधी रूपये वाचले आहेत. या कारभारामुळे कारभाऱ्यांच्या पारदर्शी कारभाराचा फुगा फुटला आहे.
जिल्हा बँकेच्या पारदर्शी कारभाराचा `तरुण भारत’ने गेल्या आठ-दहा दिवसापासून वृत्तमालिका प्रसिद्ध करून फुगा फोडला आहे. झोपेचे सेंग घेणाऱ्या कारभाऱ्यांना जाग आली असून चुकीच्या पद्धतीने केलेला कारभार दुरुस्त करण्याचा प्रयत्न सुरु केल्याचे एका निर्णयावरुन दिसून येत आहे. बँकेने संचालक, त्यांचे नातेवाईक, कुटुंबीय तसेच कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्याकडे थकीत असलेले मुद्दल 60 कोटी आणि व्याज 31 कोटी असे सुमारे 91 कोटी रुपये (राईट ऑफ) माफ केले होते. संचालक मंडळाच्या या निर्णयामुळे 102 संस्था व 40 बचतगट, कर्जदारांना कर्जमाफी मिळाली होती. या माफीमुळे बँकेवर 91 कोटींचा भुर्दंड पडला होता.
बँकेच्या कारभाऱ्यांनी मनमानी आणि नियमबाह्यपणे कारभार करुन कर्जदारांना कोटÎवधीची माफी दिल्याच्या प्रकारावर स्वतंत्र भारत पक्षाचे अध्यक्ष सुनिल फराटे यांनी आवाज उठवित चौकशीची मागणी केली होती. याची चौकशीही सुरु झाली होती. या प्रकरणाला `तरुण भारत’नेही वाचा फोडली होती. यानंतर जिल्हा बँकेच्या कारभाऱयांना जाग आली चुकीच्या पद्धतीने घेतलेला निर्णय मागे घ्यावा लागला. माफी दिलेले व्याजासह सर्व रक्कम कर्जदाराच्या खात्यावर पुन्हा थकबाकीला दाखविण्याची कार्यवाही करण्यात येत आहे.
बड्यांना सवलत आणि सामान्य सभासदांवर अन्याय करणाऱ्या कारभाऱ्यांनी बँकेत कशाप्रकारे प्रकारे मनमानी केली याचा हा नमुना असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. मागील संचालकांनी बँकेत मनमानी आणि चुकीच्या पद्धतीने कारभार केल्याने बँक बुडता-बुडता वाचली प्रशासकांनी कठोर निर्णय घेवून थकबाकी वसुल केल्याने बँकेला पुन्हा उभारी आली. असे असताना विदयमान कारभाऱ्यांनी याचे धडा घेतलेला दिसत नाही. शेतकऱ्यांनी आधार असलेल्या बँकेचा कारभार सभासदाभिमुख करण्यासाठी कारभाऱ्यांचा पारदर्शी कारभार महत्वाचा असताना सध्यस्थितीत फराटे यांच्या तक्रारीवरून तसे दिसून येत नसल्याचे उघडकीस येत आहे.
माफी दिलेल्या कर्जदार संख्या आणि रक्कम गणपती जि. कृषी औ. सह. सोसायटी सात कोटी 93 लाख पार्श्वनाथ ट्रान्सपोर्ट एक कोटी 92 लाख महा कंटेर्न्स प्रा. लि. दोन कोटी 58 लाख प्रकाश ऑग्रो तीन कोटी 21 लाख यशवंत शुगर नागेवाडी दोन कोटी 99 लाख महा.वि उत्पादक औ. संस्था दोन कोटी 77 लाख निनाईदेवी कारखाना सहा कोटी 45 लाख निनाईदेवी वाहतूक एक कोटी 71 लाख शिवशक्ती ग्लुकोज 42 लाख नेर्ला सोया बल 60 लाख वसंत बझार 32 लाख तासगाव तालुका ग्रामोद्योग 27 लाख महायुनी ड्रमस् 51 लाख |