मिरज सुधार समितीचे सार्वजनिक बांधकाम अधिकाऱ्यांना निवेदन
मिरज / प्रतिनिधी
शहरातील मिरज मालगाव रस्ता सध्या अतिक्रमणानी व्यापला असून, वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे मिरज-मालगाव रस्त्यावर दिंडीवेस ते सुभाषनगरपर्यंत अतिक्रमणे काढून रस्ता रुंदीकरण करावा, अशी मागणी मिरज शहर सुधार समितीने केली आहे. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपकार्यकरी अभियंता संतोष रोकडे यांना निवेदन देण्यात आले.
मिरज-मालगाव रस्ता हा शहराला आणि तालुक्याच्या ग्रामीण भागाला जोडणारा महत्वाचा रस्ता आहे. मात्र, दिंडीवेस ते सुभाषनगर रस्त्यावर अतिक्रमण वाढल्याने वाहतुकीस अडथळा होत आहे. रस्त्याची मालकी महापालिलेकडे असली तरी त्याचे स्वामित्व बांधकाम विभागाकडे आहे. त्यामुळे रस्ता अतिक्रमणमुक्त करून रुंदीकरण करावे, अशी मागणी सुधार समितीने दिली आहे.