पंढरपूर / प्रतिनिधी
राज्यातील साखर कारखान्यामध्ये इथेनॉल प्रकल्पातून ऑक्सिजन निर्मितीचा पायलट प्रोजेक्ट प्रकल्प धाराशिव साखर कारखान्यावर उभा होणार आहे. याबाबत वसंतदादा शुगर इन्स्टिटÎूटच्या ऑनलाईन बैठकीत निर्णय झाल्याची माहिती धारशिव कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांनी दिली.
ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या आदेशानुसार वसंतदादा इन्स्टिटÎूटने शुक्रवारी राज्यातील प्रमुख साखर कारखानदारांची ऑनलाईन मिटींग घेतली. त्यामध्ये धाराशिव शुगरचे चेअरमन अभिजीत पाटील सहभागी झाले होते. सध्या कोविडच्या दुस-या लाटेमुळे राज्यात गंभीर परिस्थिती निर्माण झालेली आहे कोविड रूग्णांना आŸिक्सजनची गरज मोठÎा प्रमाणात भासू लागलेली आहे. राज्यात दररोज हजारो रुग्ण आढळत असल्याने ऑक्सिजनचा तुटवडा फार मोठा जाणवत आहे. बैठकीवेळी व्हीएसआयकडून तातडीच्या उपाययोजना सांगण्यात आल्या. कारखान्यांकडे इथेनॉल प्रकल्प सुरू आहेत. अशा प्रकल्पामध्ये जुजबी फेरफार करून अतिरिक्त सामग्रीत ‘मॉलेक्मयुलर सिव्ह’ वापरून हावेतील वायुव्दारे ऑक्सजिनची निर्मीती मोठÎा प्रमाणात करण्याचा तपशील चेअरमन अभिजीत पाटील यांनी पटवून सांगितला.
धाराशिव साखर कारखाना प्रतिदिन 16 ते 20 टन ऑक्सिजन निर्मिती करणार असल्याचे चेअरमन अभिजीत पाटील म्हणाले. वाढत्या ऑक्सजिन तुटवड्यावर मार्ग काढण्यासाठी राज्यात प्रथमच धाराशिव साखर कारखान्याने पुढाकार घेऊन या ऑक्सजिन निर्मितीचा राज्यातील पहिला पायलट प्रकल्प कार्यरत करीत आहेत. धाराशिव साखर कारखान्यास ऑक्सजिन निर्मिती तयारीस लागणा-या परवानगी जयंत पाटील यांनी त्वरित देण्याचे सांगून लवकर पायलट प्रकल्प कार्यरत करावा असे सांगितले. वसंतदादा इन्स्टिटÎूट व मौज इंजिनिअरिंगच्या माध्यमातून हा प्रकल्प आकाराला येईल.