प्रतिनिधी / सांगली
रोटरीच्या सामाजिक उपक्रमात नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घ्यावा, असे आवाहन रोटरी डिस्ट्रिक्ट3170चे गव्हर्नर संग्राम पाटील यांनी रोटरी क्लब ऑफ सांगली तर्फे आयोजित पत्रकार बैठकीत बोलत होते.
ते म्हणाले, रोटरी 7 फोकस एरियामध्ये काम करते. पोलिओमुक्त भारतासाठी रोटरीने प्रयत्न केले आहेत. भारत साक्षरता अभियान राबवून 2025 पर्यंत संपूर्ण साक्षरतेचे अभियान पूर्ण करण्यात येत आहे. या सर्व उपक्रमात नागरिकांनी सहभाग घ्यावा, रोटरीच्या उपक्रमांना मदत करावी, असे आवाहन पाटील यांनी केले.
यावेळी गव्हर्नर पाटील यांच्या हस्ते फटाकेमुक्त दिवाळी अभियानाच्या माहितीपत्रकाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी अध्यक्ष मंदार बन्ने, असिस्टंट गव्हर्नर नितीन शहा, सेक्रेटरी शशिकांत चौगुले, रणजीत माळी, प्रेमराज जाजू, मारुती गायकवाड उपस्थित होते. स्नेहल गौंडाजे यांनी सूत्रसंचालन केले.