आमदार अनिल बाबर यांचा विरोधकांना टोला
प्रतिनिधी / विटा
मी निवडणुकीत शिवसेनेचा उमेदवार होतो. मात्र निवडणूक संपल्यानंतर जनतेचा आमदार आहे. निवडणुकीत कधी मतांचा हिशोब केला नाही. त्यामुळे कोणत्या गावात किती मते मिळाली याचा विचार न करता विकासकामे करत असतो, असा टोला लगावत सर्वानी एकत्रित काम केल्यास शहराचा सर्वांगीण विकास शक्य आहे, असे मत आमदार अनिल बाबर यांनी व्यक्त केले.
विटा शहरातील मायणी रोड ते नेवरी रस्त्याला जोडणाऱ्या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ आ. अनिल बाबर यांच्याहस्ते करण्यात आला.
यावेळी नगरसेवक अमोल बाबर, जिल्हा परिषद सदस्य सुहास बाबर, नगरसेवक अमर शितोळे, ज्येष्ठ नेते बाळासाहेब लाकडे, माजी नगराध्यक्ष नंदकुमार पाटील, शहर भाजपचे अध्यक्ष अनिल म. बाबर, शहर काँग्रेसचे अध्यक्ष सुरेश पाटील, विटा बँकेचे चेअरमन विनोद गुळवणी, माजी सभापती विनय भंडारे, उत्तम चोथे आदी उपस्थित होते.