प्रतिनिधी / पलुस
डॉ. पतंगरावजी कदम महाविद्यालय रामानंदनगर मधील बी एस सी (केमिस्ट्री) तृतीय वर्षे साठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना डोनेशनसाठी प्रवेश दिला जात नाही. ही बाब निदर्शनास आली. प्रवेश हवा असल्यास 3500/-रुपये महाविद्यालयाची फी आणि 10000/- डोनेशन मागितले जात आहे. डोनेशन भरल्यास प्रवेश मिळेल अन्यथा प्रवेश दिला जात नाही. महाविद्यालयाची प्रवेश क्षमता असतानाही विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जात नाही हे विद्यार्थ्यांवर अन्याय करणारी गोष्ट आहे. याबाबतचे निवेदन मा. तहसीलदार पलुस यांना देण्यात आले.
या सर्व विद्यार्थ्यांना महाविद्यालयाच्या फी मध्ये प्रवेश द्यावा अन्यथा दिनांक 18/11/2021 रोजी महाविद्यालयाच्या बाहेर आमरण उपोषण करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश पाटील, तालुका अध्यक्ष संदीप मुळीक, तालुका उपाध्यक्ष पवन नलवडे, सम्मेद चौगुले,तालुका सरचिटणीस पृथ्वीराज शिखरे, तालुका प्रवक्ता विश्वजित पवार आदी उपस्थित होते.