सोहोलीत महावितरण विरोधात शेतकऱ्यांचा रस्तारोको
प्रतिनिधी / कडेगाव
कृषीपंपाचा वीज पुरवठा कोणतीही पूर्व सूचना न देण्यात येता बंद केल्याच्या कारणावरुन सोहोली (ता.कडेगाव) येथील शेतकऱ्यांनी सांगली- सातारा जूण्या महामार्गावरती रस्ता रोको केला.
यावेळी महामार्गावरुन प्रवास करणारे सांगली जिल्हा भाजपा अध्यक्ष माजी आमदार पृथ्वीराजबाबा देशमुख यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न व महावितरणची समस्या समजून घेऊन सोहोली गावातील सरसकट कृषी शेतीपंपाना दोन हजार रुपये भरुन घेऊन वीज जोडणी करावी व राहिलेली रक्कम एक महिन्याने हप्त्या-हप्त्याने जमा करावीत असा तोडगा काढण्यात आला.
गावातील सर्वसाधारण वीस-बावीस ट्रान्सफॉर्मरवरील सर्व सामान्य शेतकऱ्यांच्या कृषी पंपाच्या बिलांच्या रक्कमेच्या बिलापोटी पाच लाख रुपयेचा धनादेश गावचे भाजपा युवानेते संदीप मोहिते यांनी दिला व या महामार्गावरील वाहतूक सूरळीत करण्यात आली. सर्व समावेश तोडगा निघाल्याने शेतकरी ग्रामस्थवर्गात समाधानाचे वातावरण आहे.