तब्बल आठ महिन्यांनी खुले
वार्ताहर / देवराष्ट्रे
कोरोना संसर्गामुळे तब्बल आठ महिन्यांपासुन बंद असलेले यशवंतराव चव्हाण सागरेश्वर वन्यजीव अभयारण्य दि.१ नोव्हेबरपासुन सुरू होत आहे. याबाबतची माहिती अभयारण्य प्रशासनाने दिली.
सागरेश्वर अभयारण्य हे देशातील पहिले मानवनिर्मित अभयारण्य आहे. अभयारण्याचा विस्तार १०.८७ चौ.किमी. आहे. हरणांसाठी प्रसिद्ध असणाऱ्या या अभयारण्यास वर्षभर पर्यटक भेट देत असतात. आठ महिन्यापासुन अभयारण्य बंद असल्याने अभयारण्याचा महसुलही मोठ्या प्रमाणात बुडाला होता. आता कोरोनाचा संसर्ग कमी झाल्याने अभयारण्य सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोनाच्या सर्व नियमाचे पालन करुनच पर्यटकाना अभयारण्यात प्रवेश दिला जाणार आहे.