अपक्ष उमेदवार सावित्री कवळेकर यांना विश्वास
सांगे / प्रतिनिधी
सांगेतील जनतेने आजवर जे प्रेम दिले ते आपण विसरू शकणार नाही. सांगेतील स्वाभिमानी जनता गेल्या पाच वर्षाच्या माज्या कार्याची पावती निश्चितच देतील. मी अपक्ष आमदार म्हणून कार्यरत राहणार असून निवडून आल्यावर सांगेमध्ये पर्यावरण विरहित उधोग आणून बेकारी नस्ट करणे तसेच सांगेतील जनतेला 24 तास पिण्याचे पाणी पूरर्वीण्याबरोबर महिलांना महिना रू. वीस हजार हाती येईल अशी रोजगार निर्मितीची योजना हाती घेतली जाईल. माणसाचा सर्वागीण विकास करायचा असून प्रत्येकाच्या स्वप्नातील सांगे निर्माण करण्यासाठी तुमची सेवक म्हणून कार्य करण्याची संधी द्या असे कळकळीचे आवाहन सांगे मतदार संघाच्या अपक्ष उमेदवार सावित्री बाबू कवळेकर यांनी सांगे येथिल जाहीर सभेत बोलताना केले.
आपण निवडून आल्यावर सांगे नगरपालिका क्षेत्रातील घरपट्टीचा प्रश्न सोडविण्यावर भर देणार आहे. स्पोर्ट्स सुविधा निर्मितीवर भर देऊन मोबाईल नेटवर्कची समस्या सहा महिन्यात सोडविली जाणार आहे. नेत्रावली येथे नवीन प्राथमिक आरोग्य केंद्र सुरु करण्याबरोबर सांगे आरोग्य केंद्राचा दर्जा सुधारला जाणार आहे असे सौ. कवळेकर यांनी सांगितले.
तुम्ही दोन्ही माजी आमदाराचे कार्य पहिले असून स्वस्तचा स्वार्थ साधण्यासाठी त्यांना आमदारकी हवी आहे. खाण मालाच्या वाहतूक कॉन्ट्रक्टसाठी कसे दोन्ही माजी आमदार जगडतात हे तुम्ही पाहिलेले आहे.
सांगेकरासाठी मी पाच वर्ष वावरली. निःस्वार्थ काम केले. कॉवीडच्या काळात मी मैदानात होती. लोकांच्या सुख दुःखात वावरली. ही माझी चूक होती का? असा सवाल करून मी खालच्या पातळीचे राजकारण करत नाही. मला विश्वास आहे की सांगेतील जनता परोपकारी नसून मी केलेल्या कामाच्या आधारावर जनता मला संधी देतील असा विश्वास कवळेकर यांनी व्यक्त केला.
सांगे नगरपालिका क्षेत्रातून सावित्री यांना 2500 मते देण्याचा निश्चय करूया. सावित्री यांनी ख्रिचन समाजाला खूप मदतीचा हात दिला असून सांगे चर्चच्या हॉलसाठी तांत्रिक मंजुरी मिळून देण्यासाठी मोलाचे कार्य केले आहे. सावित्री ह्या कोणताही धर्म, जात न पाहता कार्य करीत असून तमाम मतदारांनी त्यांना साथ देण्याचे आवाहन नगरसेवक मेशू डिकॉस्ता यांनी केले.
नगरसेवक संगमेश्वर नाईक यांनी स्मृती इराणी यांनी अपक्ष उमेदवारावर तोंडसूख घेताना कॉवीडच्या काळात तीने काहीच केले नसल्याचे म्हटले, जे चुकीचे आहे. स्मृती इराणी यांनी दिल्लीचे राजकारण पहावे नंतरच सांगेतील राजकारणावर बोलावे असे सांगितले.
यावेळी चंदन उनंदकर म्हणाले की सावित्री कवळेकर यांचा विजय नक्की असल्यामुळे विरोधकांना अ़फवा निर्माण करतात यावरून त्यांना त्यांचा पराभव स्पष्टपणे दिसू लागला आहे. गेल्या महिना भरात कार्यकर्त्यांनी घेतलेले परिश्रम वाया जाणार नाही ही भर उन्हात बसलेल्या मतदारानी स्पष्ट केले आहे. अपक्ष उमेदवार म्हणून एक महिला निवडून येण्याचा मान नक्कीच मिळणार असल्याचा विस्वास व्यक्त केला.
महेश गावकर म्हणाले सावित्री कावळेकरांना मानाय आणि कामेरी म्हणणाऱयांना सांगेतील जनता नक्कीच उत्तर देणार आहे. सावित्री कवळेकर जिंकून येणार हे त्रिवार सत्य म्हणून ती निवडून आल्यास भाजपा त जाणार असल्याचा खोटा प्रचार केला जात आहे. यावेळी त्यांनी काँग्रेस आणि भाजपा उमेदवारावर सडकून टीका केली.
उदय गावकर यावेळी म्हणाले विकास केला म्हणून सांगणाऱयांनी काय दिवे लावले ते सर्वांनी पाहिलेले आहे. आता वेळ आली आहे ती बदल घडविण्याची. त्यामुळे सावित्री हाच योग्य पर्याय आहे असे तो म्हणाला.
नवनाथ नाईक यांनी रावण सुद्या वध होत असताना हसत होता. पण तो मेलाच. त्यामुळे या रावणरुपी उमेदवाराचा पराभव करून घरी पाठवूया असे आवाहन केले.
यावेळी किरगाळ पाणी वाटप संस्थेचे कॉन्स्ट?सिओ मसकॅरेन्हास यांनी सावित्री यांना सर्वथरातून वाढता प्रतिसाद लाभत असून ख्रिश्चन मतदार सावित्रीला मते देऊन विजयी करतील यात शंका नाही असे सांगितले.
यावेळी व्यासपीठावर माजी उप सरपंच आर्यकुमार जांबावलीकर, माजी पंच विलास क्रास्टो, मनोज पर्येकर,क्लेफी अल्फासो, शरोन, चांगुणा साळगावकर, पांडुरंग तारी, नानू भांडोळकर, हर्षा सांबारी, चंदन उनंदकर, आनंद नाईक, सदानंद गावडे, मनोज पर्येकर, चंद्रकांत गावकर, संतोष गावकर, शफी सय्यद, संगमेश्वर नाईक, सगुण गावकर, कांता कालेकर, क्तगि् अल्फ?सो, शेरॉन डिसोझा, प्रणय कावरेकर, पावटो गावकर, जानू झोरे, जानू ताटे, प्रतिभा गावकर, आधी कार्यकर्ते उपस्थित होते.
सूत्रसंचालन सुदेश भंडारी आणि प्रशांत गावकर यांनी केले.