सांडपाणी विहिरीत पाझरत असल्याची नागरिकांची तक्रार
प्रतिनिधी /बेळगाव
अळवण गल्ली, शहापूर येथील गटारीमधील सांडपाण्याचा निचरा व्यवस्थित होत नाही. परिणामी येथील विहिरीमध्ये सांडपाणी पाझरून पाणी दूषित झाले असल्याच्या तक्रारी होत आहेत. याबाबत महापालिकेकडे तक्रार करण्यात आल्यानंतर याची पाहणी केली होती. याबाबत कोणतीच दखल घेण्यात आली नसल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे.
शहरातील गटारीचे बांधकाम महापालिकेच्यावतीने करण्यात येत आहे. याअंतर्गत अळवाण गल्ली येथील गटारीचे बांधकाम करण्यात आले आहे. मात्र गटारीचे बांधकाम करताना काही ठिकाणी गटारीचा स्लोप व्यवस्थित नसल्याने गटारीमधून सांडपाण्याचा निचरा होत नाही. अशातच गटारी स्वच्छ करण्याकडे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दुर्लक्ष केले असल्याने गटारी कचऱयाने भरल्या आहेत. परिणामी सांडपाण्याचा निचरा व्यवस्थित होत नाही. काही ठिकाणी सांडपाणी साचून विहिरीमध्ये पाझरत आहे. यामुळे परिसरातील विहिरीचे पाणी दूषित झाले आहे. विहिरी आणि कूपनलिकांचे पाणी दूषित झाल्याने वापर करणे मुष्किल बनले आहे. नळाला पाणी मुबलक मिळत नाही, पाणी पुरवठय़ात व्यत्यय निर्माण झाल्यास येथील नागरिक विहिरीच्या पाण्याचा वापर करीत असतात. पण पाणी दूषित झाले असल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत महापालिकेच्या आधिकाऱयांकडे तक्रार केली असता कोणतीच कारवाई झाली नाही. नागरिकांच्या तक्रारीनंतर वरि÷ अधिकारी पाहणी करण्यासाठी सहाय्यक अभियंत्यांना पाठवित आहेत. पाहणीनंतर कारवाई मात्र शुन्यच असल्याची तक्रार येथील रहिवासी करीत आहेत. सांडपाणी साचून राहिल्याने डेनेज दुर्गंधी आणि डासांचा उपद्रव वाढला आहे. यामुळे येथील रहिवाशांचे आरोग्य धोक्मयात आले आहे. येथील समस्येची पाहणी करून गटारी स्वच्छ करण्याचे काम हाती यावेत, अशी मागणी येथील नागरिक करीत आहेत.