ऑनलाईन टीम/तरुण भारत
सांबा जिल्ह्यात शनिवारसकाळी झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील पाच जणांना मृत्यू झाला आहे. तर एक जण गंभीर जखमी आहे. सांबा जिल्ह्यातील मानसर भागात आज सकाळी ही घटना घडलीय. संपूर्ण कुटुंब JK01U-2233 या कारमधून प्रवास करत असताना चालकाचा ताबा सुटला आणि अपघात झाला. दरम्यान, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चालकाचा कारवरील ताबा सुटल्याने कार खोल दरीत कोसळली आणि यात पाच जणांना जीव गमवावा लागलाय, असं नमूद केलंय.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हे कुटुंब सांबाहून मानसर मार्गे श्रीनगरच्या दिशेनं जात होतं. मानसर रोडवरील जमोद परिसरात एका वळणावर चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्यानं कार थेट दरीत कोसळली. दरम्यान, मार्गावरून जाणारे इतर लोक आणि स्थानिकांच्या मदतीनं कारमधील सर्व लोकांना बाहेर काढण्यात आलं व तेथून त्यांना रुग्णालयात नेण्यात आलं.