ऑनलाईन टीम / नगर :
साईबाबांच्या जन्मस्थळावरून सुरू असलेला वाद हे साधे प्रकरण नाही. हा तर सर्वसमावेशक देव, प्रतीकांच्या अपहरणाचा डाव असल्याचा आरोप महाराष्ट्र युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी केला आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकतेच साईबाबांचे जन्मस्थळ म्हणून पाथरी शहराचा विकास करण्याची घोषणा केली होती. त्यावरुन शिर्डी आणि पाथरी ग्रामस्थांमध्ये वाद सुरू झाला आहे. त्याच पार्श्वभूमीवर शिर्डीकरांनी बेमुदत बंदची हाक दिली होती. मात्र, रात्री 12 वाजता हा बंद तात्पुरता मागे घेण्यात आला आहे. साईबाबांचे जन्मस्थळ अज्ञात आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी चुकीचा उल्लेख करू नये, आपले वक्तव्य मागे घ्यावे, अशी मागणी शिर्डीकरांनी केली आहे. याच पार्श्वभूमीवर आज शिर्डीत उद्धव ठाकरे यांची बैठक होणार आहे.