वार्ताहर/ कंग्राळी बुदुक
येथील साई कॉलनीतील साई मंदिरामध्ये गुरुवारी कार्तिकोत्सव व तुलसी विवाह कार्यक्रम उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणुन प्रा. राजशेखर सलुपण्णावर व बीम्स हॉस्पिटलचे सुपरीडेंट एस. डी. माने उपस्थित होते. प्रास्ताविकामध्ये भरत होनगेकर यांनी उपस्थितांचे स्वागत करून कार्तिकोत्सव व तुलसी विवाह आदींचे महत्त्व सांगितले.
यावेळी उपस्थित भक्तांच्या हस्ते ही दीप लावण्यात आले. साईंची धुपारती झाल्यानंतर सामुहीक तुलसी विवाह कार्यक्रम पार पडला. तत्पूर्वी उपस्थित मान्यवरांचे साई भक्त मंडळीच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
सॅनिटायझर मास्क सामाजिक अंतर दर्शविणारी रांगोळी सर्वांचे आकर्षण
कार्तिकोत्सव कार्यक्रमाचे औचित्य साधून व संपूर्ण देशावर कोरोना महामारीने ओढवलेले संकट दूर कर असा संकेत दर्शविणारी साई भक्त मंडळींच्यावतीने साकारलेली रांगोळी यावेळी सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. रांगोळीच्या माध्यमातून कोरोना संकट दूर करण्यासाठी नागरिकांनी सॅनिटायझरने हात धुणे, मास्क वापरणे व एखाद्या सामुहिक कार्यक्रम किंवा इतर ठिकाणी सामाजिक अंतर राखणे याचेही भान रेखाटलेले होते.
कार्यक्रमाला शिवाजी पावले, भरत होनगेकर, नंदकुमार मोरे, मल्लेशी कांबळे, भरमा कोनेरी, विजय सुभांजी, बाळकृष्ण सुर्वे, दीपक मनसूरकरसह साई युवक मंडळाचे कार्यकर्ते व साई भक्त उपस्थित होते.