वार्ताहर / ताम्हाने
साखरपा बाजारपेठेतील कोंडगाव तिठा ते साखरपा तिठा या मुख्य रस्त्याची सध्या दयनीय अवस्था झाली आहे. तसेच परिसरात धुळीचे साम्राज्य पसरत आहे. गतवर्षी मार्च महिन्यापुर्वी या रस्त्याचे काम सुरु होते. मात्र गेले वर्षभर हे काम अपुर्ण अवस्थेतच आहे. ही दिरंगाई का होत आहे आणि याला जबाबदार कोण असा सवाल भाजपचे संगमेश्वर तालुका संघटन सरचिटणीस अमित केतकर यांनी उपस्थित केला आहे. याबाबत देवरुख येथील जि.प.बांधकाम उपविभागाकडे त्यांनी निवेदन दिले असून संबंधित अधिकारी वर्गाकडून सदर रस्त्याच्या कामाबाबत लेखी स्वरुपात माहिती मागितली आहे.