मुंबई
बाजरातील घसरणीच्या प्रभावामुळे बुधवारच्या सत्रात साखर कंपन्यांचे समभाग मोठय़ा प्रमाणात घसरले आहेत. ही घसरण 8 टक्क्यांची झाल्याने गुंतवणूकदारांमध्ये चिंतेचे वातावरण दिसून आले. काही समभाग मात्र, एक वर्षाच्या उच्चांकावर कार्यरत राहिले होते. उपलब्ध आकडेवारीनुसार बलरामपूर साखर कारखान्याचे समभाग हे 8 टक्क्यांनी घसरुन 338 रुपयावर पोहोचले आहेत. हाच समभाग सोमवारी 398 वर होता. हा भाव एक वर्षातील सर्वाधिक भाव राहिला आहे. धामपूरचा साखरेचा समभाग हा 3 टक्क्यांनी प्रभावीत होत 307 रुपयावर पोहोचला आहे. मात्र ही परिस्थिती सुधारेल अशी शक्यताही व्यक्त होत आहे.