वीरभद्र पाहण्यासाठी मोठी गर्दी. रथमिरवणुकीने साखळीतील चैत्रोत्सवाची सांगता.
डिचोली/प्रतिनिधी
विठ्ठलापूर साखळीतील चैत्रोत्सवात रविवारी पहाटे पारंपरिक वीरभद्र मोठय़ा उत्साहात साजरा करण्यात आला. ‘भुपराज’ असे घोषवाक्मय करीत पखवाज आणि ताळाच्या ठेक्मयावर हातात तलवारी घेऊन नृत्य करणाऱया वीरभद्राला पाहण्यासाठी श्री विठ्ठल रखुमाई मंदिराच्या डाव्या बाजूने खास मंडपात लोकांची मोठय़ा संख्येने गर्दी उसळली होती.
साखळीतील चैत्रोत्सवात अखेरच्या रात्रीनंतर पहाटे साजरा होणारा वीरभद्र हे या उत्सवाचे प्रमुख आकर्षण असते. गेली दोन वर्षे कोरोना महामारीमुळे चैत्रोत्सव साजरा करण्यात न आल्याने वीरभद्र सादर होऊ शकला नव्हता. त्यामुळे यावषी मोठय़ा उत्साहात हा सोहळा साजरा करण्यात येणार अशी आशा होतीच.
चैत्रोत्सवाच्या अखेरच्या रात्री दशावतारी नाटय़प्रयोग संपल्यानंतर काही वेळाने खास आकर्षक वीरभद्र विठ्ठल रखुमाई मंदिराजवळ दाखल झाला. तेथे ठेवण्यात आलेल्या बाकांवर उभे राहून त्याने सर्वांना अभिवादन केले तसेच देवाला नमस्कार केला. त्यानंतर त्याच्या हातात तलवारी देण्यात आल्या आणि समोर रचण्यात आलेल्या गवताच्या वर्तुळाला आग लावण्यात आली. बाकावर तलवारी नाचवत वीरभद्राने खाली उडी घेतली. व पेटत्या गवताला नाचतच फेरी मारली. आणि थेट तो मंडपात दाखल झाला.
मंडपात फेरे मरल्यानंतर त्याच्यावर दैवी संचार आला आणि त्याला सभोवताली असलेल्या साथीदाऱयांनी उचलून घेतले. त्याच्या हातातील तलवारी वेगळय़ा करण्यात आल्या. तसेच पाठीमागे बांधलेली प्रभावळ वेगळी करण्यात आली. आणि त्याला उचलून विठ्ठल मंदिरात नेण्यात आले. मंदिरात देवाचे तीर्थ ग्रहण करायला देऊन तसेच अंगावर तीर्थ शिंपडल्यानंतर त्याचा अवसर निवळला.
वीरभद्र सोहळा संपन्न झाल्यानंतर सकाळी विठ्ठल रखुमाई व सत्यभामाची मूर्ती रथात बसवून मंदिराभोवती मिरवणूक काढण्यात आली. या रथ मिरवणुकीनंतर या चैत्रोत्सवाची सांगता झाली.