कुडणेच्या माजी उपसरपंचा गितांजली जल्मी यांचाही प्रवेश. भविष्यात मोठय़ा संख्येने कार्यकर्ते आपमध्ये येणार – मनोजकुमार घाडी.
डिचोली/प्रतिनिधी
आमोणा साखळी येथील पत्रकार तथा कला व सांस्कृतिक क्षेत्रातील सक्रिय कार्यकर्ते मनोजकुमार घाडी यांनी कुडणे पंचायतीच्या माजी उपसरपंचा गितांजली जल्मी, त्यांचे पती गुरूदास जल्मी यांनी कुडणे येथे काल शुक्र. दि. 20 ऑगस्ट रोजी आम आदमी पक्षात प्रवेश केला. येणाऱया काळात साखळी मतदारसंघातील मोठय़ा संख्येने कार्यकर्ते आपमध्ये प्रवेश करणार असल्याचे यावेळी मनोजकुमार घाडी यां?नी सांगितले.
देऊळवाडा कुडणे येथील गुरूदास जल्मी यांच्या निवासस्थानी हा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी व्यासपीठावर आपचे गोवा प्रभारी अंकुश नारंग, दुर्गेश पाठक, गोव्याचे प्रवक्ता वाल्मिकी नायक, उपेंद्र गावकर, गुरूदास जल्मी व इतरांची उपस्थिती होती.
साखळी मतदारसंघात गेल्या 1997 सालापासून कला व सांस्कृतिक क्षेत्रात कार्य करीत असताना अनेक लोकांशी संपर्क आला. याच आधारावर आता साखळी मतदारसंघातून मोठय़ा संख्येने कार्यकर्त्यांना आप पक्षात आणणार. तसेच येणाऱया काळात या मतदारसंघात पक्षाचे संघटनात्मक कार्य करून मजबूत फळी उभी करणार. या मतदारसंघात राजकीय कार्य करताना बराच दबाव असून तो झुगारून लावण्यासाठी पक्ष श्रेचीही गरज लागणार आहे, असे यावेळी मनोजकुमार घाडी यांनी म्हटले.
गोव्यात यावेळी आपला चांगलीच संधी आहे. गोवा राज्यात अनेक समस्या असून लोकांना त्यांची पूरेपूर जाणीव आहे. सध्या भाजपच्या नावावर सत्तेवर असलेले सरकार मात्र अंतर्गतपचे काँग्रेसचे आहे. त्यामुळे हे सरकार भाजपचे नसून काँग्रेस जनता पार्टीचे बनले आहे. आतापर्यंत आम्ही निवडून दिलेल्या आमदारां?नी पक्षबदलूपणा करून जनतेचा विश्वासघात केला आहे. आता पुन्हा विश्वासघात नको. म्हणूनच गोव्यात पूर्ण बहुमताचे आप सरकर निवडून देण्याची वेळ आली आहे. सामान्य माणूस हा मोठय़ा प्रमाणात कर भरतो. या कराचे पैसे लोकांनाच कशापध्दतीने द्यावे याचे उत्तम उदाहरण अरविंद केजरीवाल यां?नी दिल्लीत दाखवून दिले आहे. दिल्लीत बऱयाच गोष्टी सरकार मोफत देत आहे. गोव्यात सरकार येताच दिल्लीतील सर्व योजना, सवलती गोवेकरांसाठी लागू होणार आहेत. असे वाल्मिकी नायक यांनी सांगितले. गोव्यात सध्या खिचडी सरकार चालू असून सध्या लोकां?आ सरकारमार्फत देण्यात येणाऱया योजना म्हणजे भाजप पक्ष देत असल्याची भावना या पक्षाने निर्माण केली आहे. आज गोव्यातील सरकारही दिल्लीतील आपची नकल करीत आहे. या पक्षाने गोव्यातील बहुजन समाजाला चांगले स्थान आणि मान दिला आहे. डिचोली तालुक्मयात भंडारी समाजाची लोकसंख्या बरीच आहे. मात्र या समाजाला केवळ मतदानासाठी वापरण्यात येत आहे. हे यापुढे होऊ नये व भंडारी समाजाचा आमदार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करूया, असे उपेंद्र गावकर यां?नी म्हटले. य कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संगम भोसले यांनी केले.