ऐन दिवाळीच्या सणात सुरक्षारक्षकांची कुटुंबे
प्रतिनिधी/ रत्नागिरी
कोकण किनारपट्टीवर नेमण्यात आलेले सागरी रक्षक गेल्या काही महिन्यांपासून पगारापासून वंचित आहेत़ त्यामुळे ऐन सणासुदीच्या वेळी त्यांची कुटुंबे आर्थिक अडचणीत सापडली आहेत़ जिल्हाभरात एकूण 59 सागरी सुरक्षारक्षक नेमण्यात आले आहेत. यात 2 सुरक्षा पर्यवेक्षकांचा समावेश आहे
सागरी किनाऱयांच्या सुरक्षेबरोबरच विनापरवाना मासेमारी नौकांवर नजर ठेवणे यासारखी कामे सुरक्षारक्षक बजावत असतात़ सकाळ, दुपार, रात्री अशा सत्रांमध्ये या सुरक्षारक्षकांना कर्तव्य बजावावे लागत़े काही लँडीग पॉईंट हे निर्जन ठिकाणी आहेत़ त्यामुळे अशा ठिकाणी ना खाण्या-पिण्याची अथवा कोणत्याही निव़ारा शेडची व्यवस्था नाह़ी अशा ठिकाणी काम करावे लागत़े जून महिन्यापासून या सुरक्षारक्षकांचा काही महिन्याचा पगार मिळालेला नसल्यामुळे सुरक्षारक्षक हवालदिल झाले आहेत़ नुकतीच दिवाळी होवून गेली. दिवाळीमध्ये तरी हा पगार मिळेल, अशी आशा सुरक्षारक्षकांना होत़ी मात्र दिवाळी होवूनही सुरक्षारक्षकांना पगाराची प्रतीक्षा लागून राहिली आह़े प्रत्येकी 14 हजार 600 रुपयांचे वेतन सागरी सुरक्षारक्षकांच्या बँक खात्यात जमा होत़े
वेतनापासून वंचित ठेवल्याने नाराजी
टाळेबंदीच्या काळात जिह्यातील प्रमुख बंदरावर सागरी सुरक्षारक्षकांकडून कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होत़ा कोविडच्या संकटामध्येही सुरक्षारक्षकांनी आपले कर्तव्य चोख बजावले होत़े असे असतानाही कामाची दखल न घेताच या सुरक्षारक्षकांना वेतनापासून वंचित ठेवण्यात आल्याने नाराजी व्यक्त होत आहे.