नवीन बॅटऱया बसविल्या : वीज पुरवठा खंडित झाल्यानंतर चारतास राहणार वीज सुरळीत
प्रतिनिधी / साटेली भेडशी:
गेले अनेक महिने साटेली भेडशीतील बीएसएनएल कंपनीची नियमित विजेअभावी खंडित होणारी रेंज आता नवीन बॅटऱया बसविण्यात आल्याने खंडित होणारी सेवा नियमितपणे चालू राहील, असे येथील अधिकाऱयांनी सांगितले.
साटेली भेडशीतील बीएसएनएल सेवा ही या ना त्या कारणाने नियमित चर्चेत होती. यात सततची खंडित होणारी मोबाईल रेंज, इंटरनेट यामुळे यावर अवलंबून असणाऱया सेवा ठप्प होत असल्याने अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असे. वीज वितरणचे वीज बिल थकविल्याने वीज वितरण विभागाकडून साटेली भेडशीतील बीएसएनएल मुख्य कार्यालयाचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला होता. यावेळी विजेअभावी बरेच दिवस रेंज सुविधा ठप्प होती. त्यामुळे ग्राहकांना या सेवेवर अवलंबून असलेल्या व्यावसायिक, शासकीय कार्यालय, बँका आदीची मोठी गैरसोय झाली. याबद्दल संबंधित अधिकारी यांना होणारी गैरसोयीविषयी वेळोवेळी कल्पना देऊनही दखल घेतली नाही. याचा उद्रेक म्हणून सरपंच लखू खरवत यांच्या नेतृत्वाखाली व्यापारी, मोबाईल ग्राहक यांनी येथील बीएसएनएल कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले होते. त्यावेळी घटनास्थळी बीएसएनएलचे जिल्हा प्रबंधक सुधाकर भिसे आदी अधिकारी येत आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली व वीज वितरणकडून होत असलेला खंडित वीज पुरवठय़ाबद्दल वीज वितरणाच्या अधिकाऱयांशी चर्चा करीत यातून सुयोग्य मार्ग काढत 31 मार्चपर्यंत वीज पुरवठा सुरळीत राहील, असे आश्वासन दिले होते. त्यानुसार वीजपुरवठा सुरळीत होता तसेच त्यावेळी जनरेटर उपलब्ध होईल, असे सांगितले होते. मात्र, त्याची पूर्तता झाली नव्हती. गेले तीन महिने विजेअभावी रेंज नियमित खंडित होत होती.
मंगळवारी बसविल्या नवीन बॅटऱया
वीज गेल्यानंतर लागलीच खंडित होणारी रेंज आता मंगळवारी नवीन बॅटऱया बसविण्यात आल्याने वीज पुरवठा खंडित झाल्यानंतरही पुढील चार तास रेंज सुविधा सुरळीत राहणार आहे, अशी माहिती कनिष्ठ दूरसंचार अभियंता नीलेश नारायने यांनी दिली. यावेळी त्यांच्यासोबत कर्मचारी परशुराम कोतेकर, गजानन राऊळ, लहू गोसावी, संजय बांदेकर, चिंतामणी दळवी उपस्थित होते.
सेवा पूर्वरत करण्यासाठी वेधले लक्ष
नियमित खंडित होणारी रेंज सुविधा अखंडित सुरू राहण्यासाठी आणि होणारी गैरसोय दूर करण्यासाठी साटेली भेडशी सरपंच लखू खरवत, ग्रामपंचायत सदस्य यांनी गणपत डांगी यांनी दूरसंचार जिल्हा प्रबंधक सुधाकर भिसे यांची भेट घेत त्यांचे लक्ष वेधले होते. त्यानुसार नवीन बॅटऱया कार्यान्वीत केल्याने समाधान व्यक्त करण्यात आले.