नियम पाळणे गरजेचे शाळा, कॉलेज काही दिवस बंद ठेवाच
प्रतिनिधी/ सातारा
कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. चिंता वाढत चालली आहे. कोरोनाला लगाम लावण्यासाठी प्रशासन मेहनत घेत आहे. तब्बल दोन महिन्यानंतर प्रथमच दोनशेचा आकडा पार केला गेला आहे. गर्दीच्या ठिकाणी अजूनही मास्कचा वापर दिसत नाही. सोशल डिस्टन्सचा पुरता बोजवारा उडललेला दिसतो आहे. नियम पाळण्याचे दूरच असल्याने कोरोनाच्याऐवजी लॉकडाऊनचीच भीती सातारकरांच्यामध्ये निर्माण होवू लागली आहे. लॉकडाऊन नकोच असे सातारकर म्हणू लागले आहेत. नियम प्रत्येकाने पाळला गेला तर कोरोना नियंत्रणात येवू शकतो, असे सातारकर म्हणत आहेत.
सातारा शहरात कोरोनाचा अजूनही कायमच फिव्हर राहिला गेला आहे. शहराची लोकसंख्या ही सुमारे दीड लाखाच्या आसपास आहे. शहरात दररोज नव्याने येणाऱयांची संख्या वेगळीच आहे. त्यामुळे जिह्यातील कोरोना बाधितांच्या वाढत्या संख्येत सातारा शहराची ही आकडेवारी मोठी दिसते. शहरात गतवर्षी कोरोनामुळे अगोदरच लॉकडाऊन झाले. त्या लॉकडाऊनच्या काळात जे हाल झाले त्यामुळे लॉकडाऊन नको पण नियम पाळुयात असे अनेकांच्या प्रतिक्रिया आल्या तर काही नागरिकांनी लॉकडाऊन काही दिवसांकरता असायला हवे. लॉकडाऊन झाल्यास नागरिकांना नेहमी गतवर्षी पोलिसांच्या काठय़ा खाव्या लागल्या. घरातील पिठ मीठ संपल्यानंतर गिरणी सुरु करण्यासाठी गिरणी चालकांना आंदोलनाची भूमिका घ्यावी लागली होती. आताही सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेमध्ये शहरात रिक्षा थांब्यावर आताशा कुठेशा रिक्षात प्रवाशी भरु लागले आहेत. एसटी बसमध्ये कुठे गर्दी होवू लागली आहे. काही दिवसांपूर्वी शाळा, कॉलेज सुरु झाले आहेत. तोच पुन्हा कोरोना कोरोनाचा जागर सुरु झाला आहे. त्यामुळे कोरोनाला ब्रेक लाव<ायचा असल्यास नियम पाळले पाहिजेत. तरीही कोरोनाला ब्रेक लागू शकतो. पण कोरोनासाठी पुन्हा लॉकडाऊन नको असा सुर सातारकरांकडून आळवला जात आहे.
लॉकडाऊन हवा कशासाठी?
कोरोनामुळे गतवर्षी लॉकडाऊन केला. अनेकांच्या नोकऱया गेल्या. अनेकांची घरं बसली. सर्वसामान्यांनी जगायचं कसं. आता कोरोना बाधितांची संख्या वाढू लागली आहे. त्याकरता प्रत्येकाने थोडीशी काळजी घेतली तर आटोक्यात येईल. परंतु पुन्हा लॉकडाऊन कशासाठी हवा आहे. नको नको मुळीच नको लॉकडाऊन.
नंदकुमार धनावडे
हिलटॉप अपार्टमेंट, माची पेठ सातारा
आम्हाला तर लॉकडाऊन नकोच
कोरोना वाढतोय म्हणून पुन्हा लॉकडाऊन करणे चुकीचे आहे. प्रत्येक नागरिकांची काही तरी जबाबदारी आहे ना. ती जबाबदारीच योग्य पद्धतीने पाळली गेली तर कोरोना होणार नाही. परंतु लॉकडाऊन केले पुन्हा तर सर्वसामान्यांचे हाल होतील. त्यामुळे आम्हाला तर लॉकडाऊन नकोच आहे. लॉकडाऊन ऐवजी नागरिकांनी स्वतः नियम पाळावेत जेणे करुन परिस्थिती नियंत्रणात येईल.