सातारा / प्रतिनिधी :
सातारा उपविभागीय पोलीस अधिकारी आंचल दलाल यांचा मार्गदशनाने प्रलंबित प्रकरणे निवारणासाठी अलंकार हॉल येथे तक्रार निवारण दिन झाला. या वेळी विभागातील नागठाणे, सातारा तालुका पोलीस स्टेशन,सातारा शहर पोलीस स्टेशन, शाहूपुरी पोलीस स्टेशन या मधील विविध प्रलंबित प्रकरणे सामंजस्याने सोडविण्यासाठी तक्रारदार आणि समोरील लोक आमने सामने बोलवून सामंजस्याने तक्रारींचे निवारण करण्यात आले.
सातारा शहर पोलीस निरीक्षक मांजरे, तालुका पोलीस निरीक्षक हंकारे, शाहूपुरीचे वाईकर आणि सर्व कर्मचारी उपस्थित होते. यावेळी 300 हून अधिक तक्रारींचे निरसन करण्यात आले. यामुळे पोलीस ठाण्यातील तक्रारी कमीत कमी वेळेत निरसन होऊन पोलीस ठाणे झिरो पेंडंसीकडे वाटचाल करतील. सातारा उपविभागीय पोलीस अधिकारी आंचल दलाल यांनी स्वतः या ठिकाणी उपस्थित राहून लोकांची गाऱ्हाणी ऐकून अधिकाऱ्यांना ते निवारण्यासाठी मार्गदर्शन केले.