प्रतिनिधी / सातारा
महाराष्ट्र शासनाने दिनांक 4 रोजी लॉकडाऊन संदर्भात नियमावली जाहीर केली. यात सार्वजनिक वाहतूक फक्त 50 टक्के क्षमतेने सुरू राहतील असे स्पष्ट आदेश असताना सातारा एस टी आगारात मात्र या आदेशाला केराची टोपली दाखवल्याने चित्र दिसत आहे.
सातारा आगारातून निघणाऱ्या बसेस क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी घेऊन सुरू आहेत, या ठिकाणी सोशल डिस्टनसिंगचा पूर्ण फज्जा उडाला असून याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.
यामध्ये सातारा शहर पोलिसांनी पाच पेक्षा जास्त ग्राहक असणाऱ्या मास्क न घालणाऱ्या लोकांवर कारवाई केली, दस्तुरखुद्द पोलीस प्रमुखांनी ही सहभाग घेतला होता. साताऱ्यात कारवाया होताना पोलिसांनी एस टी स्टँड बसेस या ठिकाणी दुर्लक्ष केल्याचे दिसते , स्टँड वर कायम स्वरूपी तैनात पोलीस ही कारवाई करताना दिसत नाही .