वाहतूक पोलिसांकडून नियोजन, सिग्नलच्या चौकालाही लावणार शिस्त
प्रतिनिधी / कराड
शहरात अवैध रिक्षा थांब्यांची संख्या वाढल्याने वाहतूक कोंडी होत आहे. या पार्श्वभूमीवर वाहतूक पोलिसांनी अवैध थांबे हटवण्याचा निर्णय घेतला आहे. नगरपरिषद प्रशासन व वाहतूक पोलीस समन्वयाने अधिकृत रिक्षा थांबे कायम करणार असून त्यासाठी वाहतूक शाखेने पत्रव्यवहार करत पाठपुरावा सुरू केला आहे. ग्रामपंचायत निवडणूक निकाल प्रक्रिया पूर्ण झाल्यावर वाहतूक शाखेकडून शहरातील या प्रश्नाचा पाठपुरावा केला जाणार आहे.