जायगांव ता. खटाव येथे ‘विकेल ते पिकेल’ अभियानाअंतर्गत कार्यक्रम
प्रतिनिधी / औंध
व्यापाऱ्यांच्या दारात जाऊन माल विक्री करणारा शेतकरी हे चित्र बदलले पाहिजे. मधल्या साखळीशिवाय शेतात पिकवलेला माल बांधावरच विक्री करुन कष्टकरी शेतकरी उद्योजक झाला पाहिजे. असे मत जिल्हा अधिक्षक कृषीअधिकारी विजयकुमार राऊत यांनी व्यक्त केले.
जायगाव ता. खटाव येथे ‘विकेल ते पिकेल’ अभियानांतर्गत ‘जानुबाई शेतकरी उत्पादक कंपनी’ संचलित “सोयाबीन शेतीमाल संकलन केंद्रा”चे उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.यावेळी आत्माचे प्रकल्प संचालक अशोक देसाई, गुरूदत्त काळे
-उत्तम देसाई साहेब, माजी सभापती शिवाजीराव सर्वगोड
संदीप मांडवे, राहुल जितकर, अनिल महामुलकर, प्रकाश भुजबळ,अक्षय सावंत, मोहन मदने, विलास काळे, राहुल कर्चे, अरविंद नाळे, जानुबाई फार्मर प्रोड्युसर कंपनीचे मार्गदर्शक रमेश देशमुख, चेअरमन किसन देशमुख, संभाजी सावंत, तानाजी चव्हाण, राहुल देशमुख, राजेंद्र देशमुख, गौरीहार देशमुख, कंपनीचे सर्व संचालक, सभासद शेतकरी उपस्थित होते.
राऊत म्हणाले कि, शेतकरी बचत गट कृषी विभागाच्या माध्यमातून आर्थिक सक्षम झाले पाहिजेत यासाठी शासनाने अनुदान देऊन या मोहिमेला चालना दिली आहे. विकेल ते पिकेल मोहिमेमुळे माल विकण्यासाठी शेतकऱ्यांचा आता थेट कंपनीशी संपर्क येणार आहे. त्यामुळे मधली साखळी नष्ट होऊन शेतकऱ्यांचा फायदा होईल. शेतकऱ्यांनी बचतगटाच्या माध्यमातून कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले. यावेळी शिवाजीराव सर्वगोड, संदीप मांडवे यांनी मनोगत व्यक्त केले. विलास काळे यांनी सूत्रसंचालन केले, अक्षय सावंत यांनी आभार मानले.