नागरिकांकडून होत आहे मागणी
वार्ताहर / कास
कोयना जलाशयाच्या कांदाटी सोळशी व कोयना खोऱ्यातील नागरिकांना दळणवळणाच्या मुख्यप्रावाहात आणणारी व दळणवळणाचे प्रमुख साधन असणाऱ्या शासनाच्या प्रवासी वाहतुक लाँच तात्काळ सुरु करण्याची मागणी भागातील नागरिकांतून व्यक्त्त होत आहे.
कोयना जलाशलाच्या पलिकडे कांदाटी सोळशी कोयना खोऱ्याच्या अतिदुर्गम भागात अनेक गावे वास्तव्य करत असून अनेक गावात अदयाप वाहतुकीसाठी रस्तेच पोहचले नाहीत. त्यामुळे त्यांच्या दळणवळणासाठी व बाजारपेठेत दवाखान्यात येण्यासाठी जिल्हा परिषदेकडून कोयना नदीमध्ये तीन विभागामध्ये तीन शासकीय लाँचची व्यवस्था केली आहे. मात्र, प्रवासी लाँच कोरोनामुळे गेल्या अनेक महिन्यांपासुन बंद असल्याने दुर्गम भागातील जनतेला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
लॉकडाऊनमध्ये बंद असणाऱ्या एसटी बसेससह अन्य प्रवासी वाहने राज्यभरात सुरू झाली असल्याने थोडा का होईन दळणवळणाला वेग आहे. मात्र, दुर्गम कादांटी खोऱ्यासह कोयना सोळसी खोऱ्यात प्रवाशांची वाहतुक करणाऱ्या शासकीय लाँच बंद असल्याने नागरिकांना जीवनावश्यक वस्तु खरेदी करण्यासाठी व आजारी पडल्यास बामणोली तापोळा येथील दवाखान्यात येण्यासाठी मोठा भुर्दंड सोसावा लागत आहे. शासनाच्या प्रवासी लाँचला जिथे वीस तीस रूपये तिकीट आकारले जाते तिथे नाईलाजास्तव खाजगी लाँचला हाजारो रुपये भाडे दयावे लागत आहे. लॉकडाऊनमुळे सर्वसामान्य नागरिकांचे अधिच कंबरडे मोडले असून र्थिक कोंडी झाली आहे त्यामुळे जिल्हाप्रशासनाने तात्काळ शासकीय प्रवासी लाँच सुरु कराव्यात.
प्रतिक्रिया
सर्वात अतिदुर्गम कांदाटी खोरे असुन या विभागातील नागरीकांची शासकीय प्रवासी लाँच विना मोठी अडचण होत आहे अनेकांना दवाखान्यात बाजारपेठेत येण्यासाठी मोठा आर्थीक भुर्दंड सोसावा लागत आहे मागील महिन्यात सुरु झालेली लाँच सेवा कोनाच्या तरी सांगण्यावरून आठ दिवसात कोरोनाच्या भिती पोटी पुन्हा बंद करण्यात आली मात्र शासकीय लाँच शिवाय नागरिकांना पर्यायच नसून प्रशासनाने तात्काळ तिनही प्रवासी लाँच सुरु कराव्यात
-राजेंद्र संकपाळ, सामाजिक कार्यकर्तें बामणोली