प्रतिनिधी / खंडाळा
खंडाळा तालुक्यातील औद्योगिकीकरणामुळे कोव्हीड 19 चा फैलाव मोठया प्रमाणात होत असल्याने ग्रामीण भागात रुग्णसंख्यां वेगाने वाढत आहे. त्याला आळा घालण्यासाठी कारखानदारी बंद ठेवण्याची मागणी करत खंडाळा तहसिल कार्यालयावर प्रशासनाची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढण्यात आली.
खंडाळा तालुक्यातील सर्व पक्षीय पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी असंवेदनशील असलेल्या प्रशासनाची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढत. खंडाळ्याचे तहसिलदार दशरथ काळे यांना निवेदन देण्यात आले. दि .7 ते 23 मे पर्यंत अत्यावश्यक सेवा वगळून सर्व कारखाने बंद न ठेवल्यास तहसिल कार्यालयासमोर सामुहिक आत्मदहन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.
याप्रसंगी सातारा जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष नितीन भरगुडे – पाटील , माजी सभापती रमेश धायगुडे पाटील ,प्रा . एस. वाय. पवार , प्रदिप माने , रामदास कांबळे , गणेश जाधव , सागर ढमाळ , अंकूश पवार , चंद्रकांत ढमाळ , गोविंद गाढवे , सुजित डेरे , श्रीकांत घाटे , अजय धायगुडे , प्रमोद जाधव , राजेंद्र नेवसे , शैलेश गाढवे,अनिरूद्ध गाढवे, प्रमोद शिंदे आदी उपस्थित होते.