सातारा / प्रतिनिधी :
कोंडवे गावात ग्रामपंचायत निवडणूकीमुळे वातावरण चांगलेच तापले असताना आज पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास अज्ञातांनी गावातील वाहनांची तोडफोड केल्याची घटना घडली. या घटनेमुळे कोंडवे परिसरात घबराट निर्माण झाली असून, अज्ञातांविरोधात सातारा तालुका पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
सातारा तालुक्यातील कोंडवे गाव हे राजकीय दृष्ट्या संवेदनशील गाव आहे. याच गावात सातत्याने काही ना काही घडामोडी होत असतात. गत पंचवार्षिक निवडणूकीवेळी गावात बिनविरोध निवडणूक झाली होती. परंतु सध्याची निवडणूक ही बिनविरोध न होता राजकीय उधाण आले आहे. पॅनेल पडू लागले आहेत. त्या राजकीय धुळवडीत चांगलेच गावचे राजकारण पेटले आहे.
आज पहाटे तीनच्या सुमारास जमीर आयुब शेख यांच्या घरासमोर लावलेली रिक्षा, जीप यांची अज्ञात व्यक्तीने तोडफोड केली. त्यांनी अज्ञातांविरुद्ध सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून, पोलीस अधिक तपास करत आहेत.