नवारस्ता / प्रतिनिधी
कोयना पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कोयना धरणाचे गेल्या सहा दिवसांपासून उघडण्यात आलेले सहा वक्र दरवाजे आज गुरुवारी बंद करण्यात आले. त्यामुळे कोयना धरणातून केवळ पायथा वीजगृह सुरू करण्यात आले आहे
गेल्या काही दिवसांपासून कोयना पाणलोट क्षेत्रात कोसळत असलेल्या संततधार पावसामुळे धरणाची पाणीपातळी नियंत्रित ठेवण्यासाठी कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे १४ ऑगस्टपासून उघडण्यात आले होते. प्रथम पावणेदोन फूट,नंतर चार, सहा ,सात आणि शेवटी दहा फुटांपर्यंत उघडून कोयना धरणातून सुमारे ५६ हजार क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग कोयना नदीपात्रात सुरू होता. त्यामुळे पाटण, कराड आणि सांगली परिसरात पुराचा धोका निर्माण झाला होता.
मात्र गेल्या चोवीस तासांपासून पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कमी झाल्याने गुरुवारी सकाळी कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे बंद करून धरणाच्या पायथा विजगृहातून केवळ 2100 क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग चालू ठेवण्याचा निर्णय कोयना सिंचन विभागाने घेतला आहे.
दरम्यान कोयना धरणात सध्या 91.63 टीएमसी पाणीसाठा असून धरण पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी अजून 13 टीएमसी इतक्या पाण्याची गरज आहे.
जिल्ह्यातील प्रमुख धरणांची पाणी पातळी
कोयना धरणात आज 86.51 टी. एम.सी. उपयुक्त पाणीसाठा असून त्यांची टक्केवारी 86.40 इतकी आहे. कोयना धरण पाणलोट क्षेत्रात आज सकाळी 8 वाजेपर्यंत कोयना येथे 41 नवजा येथे 41 व महाबळेश्वर येथे 47 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
सातारा जिल्ह्यातील इतर प्रमुख धरणातील उपयुक्त पाणीपातळी टी.एम.सी.मध्ये व टक्केवारी कंसात पुढील प्रमाणे. धोम – 10.66 (91.18), धोम-बलकवडी 3.62 (91.43), कण्हेर – 8.50 (88.56), उरमोडी – 9.13 (94.58), तारळी- 5.34 (91.48), निरा-देवघर 10.44 (89.02), भाटघर-23.17 (98.59), वीर – 9.00 (95.68),