बंदिस्त गटार योजना नक्की कोणासाठी राबवली जाते आहे
प्रतिनिधी / खेड
खेड ग्रामपंचायत हद्दीतील विठ्ठल कृपा कॉलनी मधील रस्ता गेलो अनेक वर्ष चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली, चारी बाजूने डांबरीकरण झाले परंतु या 40 फूट लांब रस्त्याचे डांबरीकरण करण्यास जाणीव पूर्वक टाळाटाळ केल्याचे जाणवते, 40 फुटाच्या पुढे रस्ता आहे , मात्र येतील रस्ता गायब आहे, तसेच दरम्यानच्या काळात 2 सरपंच होऊन गेले आता प्रशासक नेमणून करण्यात आली मात्र रस्त्याचा शोध लागलाच नाही, दरम्यानच्या काळात पंचायत समिती सभापती मिलिंद कदम यांनी येऊन पाहणी केली , रस्ता आणि गटर चे काम मंजूर आहे असे सांगून, तात्पुरते मोजमाप करून निघून गेले. त्याला 3 वर्ष होऊन गेले.
सदर कॉलनीतील गायब असणाऱ्या या रस्त्याच्या बाजूने साधारण 60 फूट गटार बंदिस्त न करता तसेच हा भाग वगळून इतर ठिकाणी बंदिस्त करण्यात आले, असल्याचे निदर्शनास येते, परिणामी तेथे वास्तव्यास असणाऱ्या आपर्टमेंच्या बोर ला अतिशय दुर्गंधी युक्त फेसाळ पाणी येत असून त्याचा वापर करण्यास पाणी योग्य नाही, सरपंच , सभापती , ग्रामसेवक यांना परिस्थिती दाखवून सांगून आजही जैसे थे आहे असे दिसते.
कॉलनीतील पाठीमागील रहिवाशी यांचे सर्व सांडपाणी मोकळ्या जागेत सोडल्याने कमालीची दलदल आणि दुर्गंधी पसरली आहे, येथील नागरिकांचे आरोग्य गेली 4 वर्ष धोक्यात असून मूलभूत सुविधा कधी मिळतील याकडे येथील नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे.
ग्रामपंचायत मर्फत पाणी पुरवठा केला जातो ते ही अल्प प्रमाणत मात्र पाणी बिल नियमित येते, बिल भरण्यास विलंब झाला तर पुरवठा बंद करू असे सांगण्यात येते, परिसरात सर्वच नागरिक मोटर लाऊन पाणी खेचतात, ज्यांच्याकडे मोटर नाही त्यांचे मात्र कायम पाण्याविना हाल होतात, महिन्यातून 5 मंगळवार पाणी पुरवठा बंद असतो तर मुख्य पाणी खेचनारी मोटर नादुरूस्त आहे अशा कारणाने 5 ते 6 दिवस पाणी पुरवठा दर महिन्याला बंद असतो, अशा वेळी ग्रामपंचायत कसलीही माहिती देत नाही अथवा पाणी पुरवठ्याची व्यवस्था करत नाही, पाणी पुरवठा total 12 ते 15 दिवस होतो आणि बिल मात्र संपूर्ण महिन्याचे आकारण्यात येते.