●पालिकेने केली होती कृत्रिम तळ्यात सोय
●फुटक्या तलावाजवळ ठेवले होते हौद
●निर्माल्यासाठी ठेवले होते कुंड
●पालिकेची पथके होती ठिकाणी तैनात
●पोलिसांचा करडी होती नजर
●गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी दिला बाप्पांना निरोप
सातारा/प्रतिनिधी
गौराई आणि घरगुती गणपती गेले सात दिवस कोरोनाच्या काळात ही उत्साही वातावरणात आले होते. प्रत्येक गणेश भक्तांच्या घरात सुख, शांती, भरभराट होऊ दे असा आशीर्वाद देत आपले लाडके बाप्पा सातव्या दिवशी त्यांच्या गावी चालले. सातारा शहरात पालिकेच्या वतीने विसर्जन तळ्यात सोय केली होती. निर्माल्यासाठी कुंड ठेवले होते.पालिकेच्या टीम कार्यरत होत्या. मंत्री शंभूराज देसाई यांनी त्यांच्या घरातल्या बाप्पाना भक्तिभावाने निरोप दिला.
गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या, कोरोनाला घेऊन जा, एक दोन तीन चार गणपतीचा जयजयकार अशा घोषणा देत गणेश भक्तांनी भावपूर्ण निरोप आपल्या लाडक्या बाप्पाना दिला. सकाळी गौराईच्या समोर घरातील महिलांनी दोरे घेण्याचा आणि हळदी कुंकूचा कार्यक्रम उरकल्यावर दुपारी बारा वाजल्यापासून शहरात गणपती आणि गणेश विसर्जनाची सुरुवात झाली. आपल्या वाहनातुन गणेश भक्त केवळ दोन व्यक्ती आपल्या लाडक्या बाप्पाना आणि गौराईना घेऊन पालिकेच्या कृत्रिम तळ्यात विसर्जन करण्यात येत होते. मंगळवार तळे आणि फुटके तळे परिसरात हौद ठेवण्यात आले होते.निर्माल्यासाठी कुंड ठेवले होते.पालिकेच्या वतीने हुतात्मा स्मारक, अण्णासाहेब कल्याणी शाळेच्या समोरील तळे, सदर बाजार येथील दगडी शाळेच्या परिसरातील तळे येथे विसर्जन करण्यात आले. पोलिसांनी खडा पहारा ठेवला होता.
गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी दिला बाप्पांना निरोप
गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या घरच्या गणपतीचे आज विधिवत पूजन करून घरात आरती करून पालिकेच्या हुतात्मा स्मारकालगत असलेल्या तळ्यात विसर्जन करण्यात आले.यावेळी यशराज देसाई यांच्यासह कुटूंबिय उपस्थित होते.