सातारा / प्रतिनिधी :
साताऱ्यातील भिमाबाई आंबेडकर झोपडपट्टीच्या घरकुलात एका इमारतीला पाणी टंचाई भेडसावत आहे. रात्री टेरेसवरच्या पाण्याच्या टाकीतून पाणी आणायला गेलेल्या दत्ता वसंत कदम (वय 55) यांचा टेरेसवरून पाय घसरून पडून मृत्यू झाला. कैलास स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. इमारतीतील रहिवाशांनी बिव्हिजिवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.