सातारा शहर शिवसेनेची मागणी
सातारा/ प्रतिनिधी
सध्या सातारा जिल्हयात कोरोनाची संख्या दिवसेंदिवस वाढत असून अजूनही नागरीकांना त्यांचे गांभीर्य राहिलेले नाही. दुकाने, भाजीमंडई इ. ठिकाणी सोशल डिस्टसिंग न पाळता नागरिक विनाकारण गर्दी करीत आहेत. प्रशासन आपले काम चोख करीत असुन सुध्दा जनता त्यांना साथ देत नाही. सध्याचा दररोजचा वाढता आकडा पाहता कोरोनाच्या समूह संक्रमणाची भिती निर्माण झाली आहे. त्यामुळे अनेक नागरिकांनी जनता कर्फ्यूची मागणी केली आहे. आणि सातारा शहर शिवसेनेनेही पत्रकाद्वारे मागणी करीत असल्याचे शहरप्रमुख बाळासाहेब शिंदे यांनी म्हंटले आहे. .
त्यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, कोरोनाची ही साखळी तोडण्यासाठी सातारा जिल्हा पूर्ण १० दिवस कडक जनता कर्फ्यू करावा आणि त्यामध्ये फक्त अत्यावश्यक सेवा सोडून कोणासही सवलत देवू नये. तरच ही कोरोनाची साखळी तोडण्यास आपण यशस्वी होवू. जिल्हाधिकारी हे सक्षम व अभ्यासू अधिकारी आहेत. ते आमच्या या सुचनेचा नक्कीच विचार करतील आणि लवकरात लवकर सातारा जिल्हयात १० दिवसाचा एकदम कडक जनता कर्फ्यू लागू करतील असे सातारा शहर शिवसेनेच्या वतीने म्हंटले आहे.