सातारा/प्रतिनिधी
सातारा येथे २१ व्या सातारा जिल्हा ग्रंथ महोत्सवाचे प्रख्यात लेखक कविवर्य इंद्रजित भालेराव यांच्या हस्ते आज, दिमाखदार उद्घाटन झाले. जिल्हा परिषद मैदानावर पुढील ४ दिवस हा महोत्सव सुरू राहणार आहे. या महोत्सवात विविध कार्यक्रमाचे आयोजन देखील करण्यात आलय.
या ग्रंथ महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी ग्रंथ महोत्सव समितीचे सर्व पदाधिकारी व इतर मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी सातारा शहरातील सर्व शाळा महाविद्यालयाचे विद्यार्थी, शिक्षक वर्ग व बहुसंख्य सातारकर नागरिक उपस्थित होते. या महोत्सवात जिल्ह्यातून विविध पुस्तक प्रकाशकांनी आपले पुस्तकाचे स्टॉल लावले आहेत.